शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

खरीप पिकांना मिळाली नवसंजीवनी

By admin | Updated: July 15, 2015 01:20 IST

चिखली तालुक्यातील खरीप पिकांना मिळाले खडकपूर्णाचे पाणी

चिखली (जि. बुलडाणा): जिल्हय़ात सर्वत्र पावसाअभावी खरिपाची पिके कोमेजून जात असून, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याचे विदारक चित्र आहे; मात्र शेतकर्‍यांना अशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार, याची जाणीव असलेल्या माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या दूरदृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे तीन हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी ऐनवेळी कालव्यात सोडल्या गेल्यामुळे लाभक्षेत्रातील अनेक शेतकर्‍यांची पिके वाचविण्यात यश आले आहे.खरिपाच्या पेरणीपूर्वीच माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही निसर्गाने अवकृपा केल्यास खरीप हंगामात किमान दोन वेळा पाणी देण्याची वेळ आल्यास शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी खरीप हंगामाकरिता राखीव ठेवून खरीप हंगाम आवर्तन कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी, अशी मागणी पांटबंधारे विभागाकडे केली होती. दरम्यान, तालुक्यात पेरणीपश्‍चात पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती शेतकर्‍यांवर ओढावणार, याची बहुदा जाणीव असलेल्या भारत बोंद्रे यांनी गत महिन्यात पाटबंधारे विभागाकडे केलेल्या मागणीचा तातडीने पाठपुरावा केल्यामुळे जलसंपदा विभागाने खकडपूर्णा प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडण्याचा निर्णय घेऊन ९ जुलैपासून कालव्यात पाणी सोडल्यामुळे लाभक्षेत्रातील सुमारे तीन हजार हेक्टरवरील खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्यास मदत झाली असून, भारत बोंद्रे यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.