शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खामगावकरांना नळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 11:32 IST

Khamgaon News नगरपालिकेतील वाढीव पाणीपुरवठा योजना गत ११ वर्षांपासून अस्तित्वात आलेली नाही.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव विधानसभा क्षेत्रातील अग्रगण्य व जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगरपालिकेतील वाढीव पाणीपुरवठा योजना गत ११ वर्षांपासून अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे शहरवासीयांना नळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. वाढीव पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यास राजकीय उदासीनता कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा आहे.महसुली मोठे शहर म्हणून खामगाव शहराचा जिल्ह्यात नाव लौकीक आहे. टेकडीचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या खामगावात सतत पाण्याचे दुर्भीक्ष जाणवते. शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ३१ जुलै, २००९ मध्ये वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. राजकीय उदासीनता आणि कंत्राटदाराच्या दप्तर दिरंगाईमुळे तब्बल ११ वर्षे रखडलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेवर सद्यस्थितीत ४५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, अद्यापही याजनेतून पाणीवाटपासाठी खामगावकरांना प्रतीक्षा कायम आहे. उच्च न्यायालयाने मुदत वाढ दिल्यानंतर तब्बल दोन वर्षे लोटल्यानंतरही योजना कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजना खामगावकरांसाठी ‘पाढरा हत्ती’ ठरत असल्याचे दिसून येते. दरम्यान, पुढील महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागत असून, नागरिकांना तीव्र पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. हे निश्चित. पाण्याची ज्वलंत समस्या लक्षात घेता, नळ योजनेचा प्रश्न  मार्गी लावावा, अशी मागणी हाेत आहे. 

पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वाढीव पाइपलाइन पूर्ण करण्यात आलेली आहे. फिल्टर प्लान्टचेही काम अंतिम टप्यात आहे.- संजय मुन्ना पुरवार, उपाध्यक्ष, नगरपरिषद, खामगाव

 

लोकप्रतिनिधींची उदासीनता!वाढीव पाणीपुरवठा योजना अवघ्या वर्षभरात कार्यान्वित करण्याचे आश्वासन पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सन २०१५ मध्ये दिले होते. मात्र, या आश्वासनाला तब्बल चार वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही खामगावात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. शहरातील पाणी समस्येला लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत असल्याचा जनतेत सूर उमटत आहे. ही पाणीपुरवठा योजना तत्काळ चालू करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

कंत्राटदार कंपनीची बँक गॅरंटी केली होती जप्तवाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम रखडविणाऱ्या मुंबई येथील कंत्राटदार कंपनीची ५ कोटी २० लक्ष रुपयांची बँक गॅरंटी गोठविण्यात आली होती. विविध कारणांवरून ही कंपनी तीन वेळा मुंबई उच्च न्यायालयात गेली होती, तसेच एक वेळ जिल्हाधिकाऱ्यांकडेही या संदर्भात सुनावणी झाली होती. मात्र, तरीहीही गत पाच वर्षांतही वाढीव पाणीपुरवठा योजनेला एकदाही गती मिळालेली नाही. 

टॅग्स :khamgaonखामगावwater transportजलवाहतूक