शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

खामगावकरांना नळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 11:32 IST

Khamgaon News नगरपालिकेतील वाढीव पाणीपुरवठा योजना गत ११ वर्षांपासून अस्तित्वात आलेली नाही.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव विधानसभा क्षेत्रातील अग्रगण्य व जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगरपालिकेतील वाढीव पाणीपुरवठा योजना गत ११ वर्षांपासून अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे शहरवासीयांना नळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. वाढीव पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यास राजकीय उदासीनता कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा आहे.महसुली मोठे शहर म्हणून खामगाव शहराचा जिल्ह्यात नाव लौकीक आहे. टेकडीचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या खामगावात सतत पाण्याचे दुर्भीक्ष जाणवते. शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ३१ जुलै, २००९ मध्ये वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. राजकीय उदासीनता आणि कंत्राटदाराच्या दप्तर दिरंगाईमुळे तब्बल ११ वर्षे रखडलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेवर सद्यस्थितीत ४५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, अद्यापही याजनेतून पाणीवाटपासाठी खामगावकरांना प्रतीक्षा कायम आहे. उच्च न्यायालयाने मुदत वाढ दिल्यानंतर तब्बल दोन वर्षे लोटल्यानंतरही योजना कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजना खामगावकरांसाठी ‘पाढरा हत्ती’ ठरत असल्याचे दिसून येते. दरम्यान, पुढील महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागत असून, नागरिकांना तीव्र पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. हे निश्चित. पाण्याची ज्वलंत समस्या लक्षात घेता, नळ योजनेचा प्रश्न  मार्गी लावावा, अशी मागणी हाेत आहे. 

पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वाढीव पाइपलाइन पूर्ण करण्यात आलेली आहे. फिल्टर प्लान्टचेही काम अंतिम टप्यात आहे.- संजय मुन्ना पुरवार, उपाध्यक्ष, नगरपरिषद, खामगाव

 

लोकप्रतिनिधींची उदासीनता!वाढीव पाणीपुरवठा योजना अवघ्या वर्षभरात कार्यान्वित करण्याचे आश्वासन पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सन २०१५ मध्ये दिले होते. मात्र, या आश्वासनाला तब्बल चार वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही खामगावात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. शहरातील पाणी समस्येला लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत असल्याचा जनतेत सूर उमटत आहे. ही पाणीपुरवठा योजना तत्काळ चालू करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

कंत्राटदार कंपनीची बँक गॅरंटी केली होती जप्तवाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम रखडविणाऱ्या मुंबई येथील कंत्राटदार कंपनीची ५ कोटी २० लक्ष रुपयांची बँक गॅरंटी गोठविण्यात आली होती. विविध कारणांवरून ही कंपनी तीन वेळा मुंबई उच्च न्यायालयात गेली होती, तसेच एक वेळ जिल्हाधिकाऱ्यांकडेही या संदर्भात सुनावणी झाली होती. मात्र, तरीहीही गत पाच वर्षांतही वाढीव पाणीपुरवठा योजनेला एकदाही गती मिळालेली नाही. 

टॅग्स :khamgaonखामगावwater transportजलवाहतूक