शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

खामगाव : उत्पादन येण्याआधीच सोयाबीनच्या दरात ७०० रुपयांची घट

By विवेक चांदुरकर | Updated: September 4, 2022 22:07 IST

आताच भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

सोयाबीनच्या शेंगा धरल्या असून, पुढील महिन्यात पीक येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सोयाबीनच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाली आहे. शेतकऱ्यांचे पीक बाजारात आल्यावर दरवर्षीप्रमाणे आणखी भाव घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. गतवर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षीही जास्त भाव मिळेल या आशेने पेरणी केली. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र ३ लाख ९४ हजार ४२५ आहे. तर यावर्षी ३ लाख ९७ हजार ४५३ हेक्टरवर म्हणजे १००.७७ टक्के पेरणी झाली आहे. जास्त दर मिळेल या आशेने सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा सात हजार हेक्टरवर जास्त पेरणी करण्यात आली आहे.

सोयाबीनचे दर गत दहा दिवसांपर्यंत ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत होते. दोन महिने हेच दर स्थिर होते. मात्र, आता दहा दिवसांत सातशे ते आठशे रुपयांनी भाव घसरले आहेत. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा दर ४३०० ते ५३०० पर्यंत आहे. एक महिन्यानंतर शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यावर आणखी भाव घसरण्याची शक्यता आहे. यावर्षी जिल्ह्यात पाऊस उशिरा झाला. त्यामुळे पेरणी उशिरा करण्यात आली. त्यातच जुलै महिन्यामध्ये सतत पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. यावर्षी जास्त भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आताच भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी