शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

#खामगाव कृषि महोत्सव : सीताफळ नाशवंत नसून ‘यशवंत’ फळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातही सीताफळाचे उत्पादन चांगले आहे. मात्र आजही अनेक शेतकरी सीताफळ नाशवंत पीक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतू सीताफळ हे नाशवंत पीक नसून ते शेतक-यांसाठी ‘यशवंत’ आहे, असे मत सीताफळ जानेफळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देशेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांचे मत 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  सीताफळ हे पीक सन १९८४ मध्ये जंगलातून शेतीमधील फळबागेत आले. महाराष्ट्रातील हवामान या पीकास पोषक असल्याने सीताफळाचे उत्पादन महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे येवू शकते. तसेच बुलडाणा जिल्ह्यातही सीताफळाचे उत्पादन चांगले आहे. मात्र आजही अनेक शेतकरी सीताफळ नाशवंत पीक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतू सीताफळ हे नाशवंत पीक नसून ते शेतक-यांसाठी ‘यशवंत’ आहे, असे मत सीताफळ जानेफळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांनी व्यक्त केले. खामगाव येथील कृषी महोत्सवात ‘सीताफळ शेती व भविष्य वेध’या विषयावर मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. पुढे बोलताना रमेश निकस म्हणाले की, सीताफळाचे एका एकरातून १५ हजारापासून अडीच हजार रुपयांचे उत्पादन घेता येवू शकते. आक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात पाण्याचा ताण पडू देवू नये, तसेच उन्हाळ्यातील दिवसात हे पीक विश्रांतीच्या अवस्थेत असते. त्यामुळे उन्हाळ्यात या पीकाला जास्त पाण्याची गरज भासत नाही. सीताफळाचे भाव कमी झाल्यास सीताफळाचा गर काढून शेतक-यांना आर्थिक फायदा चां गला होऊ शकतो. जूनमध्ये रसशोषण करणारी कीड सीताफळावर येते. त्यामुळे त्यावर वेळीच कीडनाशक औषधांची फवारणी दोन वेळा करावी. सीताफळामध्ये चार वर्षानंतर कुठलेही आंतरपीक घेवू नाही, त्यामुळे सीताफळाच्या उत्पादनात वाढ होईल, असेही रमेश निकस यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव