शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

#खामगाव कृषी महोत्सव : गटशेतीतून लाखोंची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:54 IST

खामगाव: नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे शेती  फायद्याची की तोट्याची, याची नेहमीच चर्चा होते; परंतु काही शेतकरी संकटावर  मात करून सकारात्मकतेने आधुनिक, सेंद्रिय पद्धतीने शेती करून कमी  खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेत आहेत. वसंत बळीराम पाटील त्यापैकीच एक शे तकरी. त्यांनी गावातील २२ शेतकर्‍यांना संघटित करून गटशेतीचा प्रयोग सुरू  केला आणि पाहता-पाहता गटशेतीचे उत्पन्न ३५-४0 लाखांपर्यंत पोहोचविले. 

ठळक मुद्देशेतमाल थेट ग्राहकांपर्यंत सेंद्रिय शेती, बीजोत्पादन करून उन्नती

नितीन गव्हाळे। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे शेती  फायद्याची की तोट्याची, याची नेहमीच चर्चा होते; परंतु काही शेतकरी संकटावर  मात करून सकारात्मकतेने आधुनिक, सेंद्रिय पद्धतीने शेती करून कमी  खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेत आहेत. वसंत बळीराम पाटील त्यापैकीच एक शेतकरी. त्यांनी गावातील २२ शेतकर्‍यांना संघटित करून गटशेतीचा प्रयोग सुरू  केला आणि पाहता-पाहता गटशेतीचे उत्पन्न ३५-४0 लाखांपर्यंत पोहोचविले. नांदुरा तालुक्यातील वडी गावचे राहणारे वसंत पाटील यांच्याकडे १५ एकर शेती.   सततची नापिकी, रासायनिक खतांचा वापर, कमी उत्पन्न यामुळे पाटील वैतागले.  त्यांनी शेतामध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली. कमी खर्चामध्ये आणि त्यात  सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करीत, त्यांनी शेतात कडधान्ये, मिश्र पिके,  रब्बी पिके घेण्यास सुरुवात केली आणि विषमुक्त शेतामालावर प्रक्रिया करून  त्यांनी हा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविला. शेतमालाला मिळणारा अल्प  मोबदला, ऑनलाइन नोंदणीच्या प्रश्नातून त्यांनी स्वत:ची सुटका तर केलीच,  शिवाय गावातील २२ शेतकर्‍यांना एकत्र करून जय श्रीराम सेंद्रिय शेतकरी  स्वयंसहायता गट २0१६ मध्ये सुरू केला आणि १00 एकराची गटशेती  करण्यास सुरुवात केली. गटाचे अध्यक्ष गणेश घाटे पाटील, गटप्रमुख वसंत  पाटील यांनी शेतातील माल व्यापार्‍याकडे न देता, त्यांनी शेतकर्‍यांनाच उत्पादक ते  विक्रेता बनविले. राज्यभरातील अनेक शहरामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शे तामालाची थेट विक्री होते. तूर, उडीद, मूग, तीळ, चना डाळ,  गूळ, गहू,  ज्वारीची विक्री करून दुप्पट नफा कमावितात.  १00 एकरातून  जय श्रीराम  सेंद्रिय शेतकरी स्वयंसहायता गटातील शेतकरी दरवर्षी ३५-४0 लाख रुपयांचे उत् पन्न मिळवितात.  त्यांनी केलेला गटशेतीचा प्रयोग विदर्भातील शेतकर्‍यांना कृषी  विकासाची दिशा देणारा आहे. 

कृषी अवजारे बँकेची निर्मितीकृषी महोत्सवामचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी  अवजारे बँकेस प्रोत्साहन देण्याचा शासनाचा विचार असल्याचे मत व्यक्त केले  होते; परंतु त्यापूर्वीच बुलडाणा तालुक्यातील सावळी व चांडोळ सर्कलमधील  सहा गावांमधील २९0 शेतकर्‍यांनी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत  चांडोळ फार्मस प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. शेतकर्‍यांना बाजारपेठ मिळवून  देणे, उत्पादन खर्च कमी करणे, आधुनिक शेती, शेतमालाची प्रक्रिया करणे  आणि सेंद्रिय शेती करून बीजोत्पादन करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर  या शेतकर्‍यांनी सामूहिक तत्त्वावर कृषी अवजारे बँक सुरू केली. या बँकेच्या  माध्यमातून शेतकर्‍यांना शेती मशागतीसाठी, शेतमाल प्रक्रियेसाठी यंत्र, शेती  अवजारे अल्प दरात उपलब्ध करण्यात येतात. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव