शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषी महोत्सव : गटशेतीतून लाखोंची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:54 IST

खामगाव: नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे शेती  फायद्याची की तोट्याची, याची नेहमीच चर्चा होते; परंतु काही शेतकरी संकटावर  मात करून सकारात्मकतेने आधुनिक, सेंद्रिय पद्धतीने शेती करून कमी  खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेत आहेत. वसंत बळीराम पाटील त्यापैकीच एक शे तकरी. त्यांनी गावातील २२ शेतकर्‍यांना संघटित करून गटशेतीचा प्रयोग सुरू  केला आणि पाहता-पाहता गटशेतीचे उत्पन्न ३५-४0 लाखांपर्यंत पोहोचविले. 

ठळक मुद्देशेतमाल थेट ग्राहकांपर्यंत सेंद्रिय शेती, बीजोत्पादन करून उन्नती

नितीन गव्हाळे। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे शेती  फायद्याची की तोट्याची, याची नेहमीच चर्चा होते; परंतु काही शेतकरी संकटावर  मात करून सकारात्मकतेने आधुनिक, सेंद्रिय पद्धतीने शेती करून कमी  खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेत आहेत. वसंत बळीराम पाटील त्यापैकीच एक शेतकरी. त्यांनी गावातील २२ शेतकर्‍यांना संघटित करून गटशेतीचा प्रयोग सुरू  केला आणि पाहता-पाहता गटशेतीचे उत्पन्न ३५-४0 लाखांपर्यंत पोहोचविले. नांदुरा तालुक्यातील वडी गावचे राहणारे वसंत पाटील यांच्याकडे १५ एकर शेती.   सततची नापिकी, रासायनिक खतांचा वापर, कमी उत्पन्न यामुळे पाटील वैतागले.  त्यांनी शेतामध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली. कमी खर्चामध्ये आणि त्यात  सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करीत, त्यांनी शेतात कडधान्ये, मिश्र पिके,  रब्बी पिके घेण्यास सुरुवात केली आणि विषमुक्त शेतामालावर प्रक्रिया करून  त्यांनी हा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविला. शेतमालाला मिळणारा अल्प  मोबदला, ऑनलाइन नोंदणीच्या प्रश्नातून त्यांनी स्वत:ची सुटका तर केलीच,  शिवाय गावातील २२ शेतकर्‍यांना एकत्र करून जय श्रीराम सेंद्रिय शेतकरी  स्वयंसहायता गट २0१६ मध्ये सुरू केला आणि १00 एकराची गटशेती  करण्यास सुरुवात केली. गटाचे अध्यक्ष गणेश घाटे पाटील, गटप्रमुख वसंत  पाटील यांनी शेतातील माल व्यापार्‍याकडे न देता, त्यांनी शेतकर्‍यांनाच उत्पादक ते  विक्रेता बनविले. राज्यभरातील अनेक शहरामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शे तामालाची थेट विक्री होते. तूर, उडीद, मूग, तीळ, चना डाळ,  गूळ, गहू,  ज्वारीची विक्री करून दुप्पट नफा कमावितात.  १00 एकरातून  जय श्रीराम  सेंद्रिय शेतकरी स्वयंसहायता गटातील शेतकरी दरवर्षी ३५-४0 लाख रुपयांचे उत् पन्न मिळवितात.  त्यांनी केलेला गटशेतीचा प्रयोग विदर्भातील शेतकर्‍यांना कृषी  विकासाची दिशा देणारा आहे. 

कृषी अवजारे बँकेची निर्मितीकृषी महोत्सवामचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी  अवजारे बँकेस प्रोत्साहन देण्याचा शासनाचा विचार असल्याचे मत व्यक्त केले  होते; परंतु त्यापूर्वीच बुलडाणा तालुक्यातील सावळी व चांडोळ सर्कलमधील  सहा गावांमधील २९0 शेतकर्‍यांनी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत  चांडोळ फार्मस प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. शेतकर्‍यांना बाजारपेठ मिळवून  देणे, उत्पादन खर्च कमी करणे, आधुनिक शेती, शेतमालाची प्रक्रिया करणे  आणि सेंद्रिय शेती करून बीजोत्पादन करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर  या शेतकर्‍यांनी सामूहिक तत्त्वावर कृषी अवजारे बँक सुरू केली. या बँकेच्या  माध्यमातून शेतकर्‍यांना शेती मशागतीसाठी, शेतमाल प्रक्रियेसाठी यंत्र, शेती  अवजारे अल्प दरात उपलब्ध करण्यात येतात. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव