शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

#खामगाव कृषी महोत्सव : शेतकर्‍यांना पडली आधुनिक शेती तंत्रज्ञानाची भुरळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:02 IST

खामगाव: कृषी महोत्सवामध्ये चारशेच्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग दिसून येत आहे. महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असून, सोमवारी शिवजयंतीनिमित्त ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या विशेष महानाट्याचे आयोजन रात्री ८ ते १0 या वेळेत करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. 

ठळक मुद्देविविध स्टॉलवर बघण्यासाठी जिल्हय़ातील ग्रामीण भागातून झाली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कृषी महोत्सवामध्ये चारशेच्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग दिसून येत आहे. महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असून, सोमवारी शिवजयंतीनिमित्त ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या विशेष महानाट्याचे आयोजन रात्री ८ ते १0 या वेळेत करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. कृषी महोत्सवात प्रक्रिया उद्योगासाठीचे यंत्र प्रात्यक्षिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. शेतकरी बचत गटाच्या सदस्यांनी प्रक्रिया यंत्राची माहिती उत्सुकतेने जाणून घेताना दिसत आहेत. फलोत्पादन शेतीकडे बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्‍यांचा सर्वाधिक कल दिसून आला.  या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली बी रहित मोसंबी, लिंबू, विविध प्रकारचा भाजीपाला पिके आदींची माहिती शेतकरी घेत आहेत. सौर ऊर्जेवरील यंत्र, कीटकनाशके, फवारणी यंत्रे बघण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी बांधव मोठी गर्दी करीत आहेत. संरक्षित शेतीच येत्या काळात तारणार असल्याने, शेतकर्‍यांचा त्याकडेही ओढा असल्याचे दिसून येत आहे. तसेच हवामान बदल व पावसाची अनिश्‍चितता पाहता, शेतकरी त्रस्त आहे. त्या दृष्टिकोनातून कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले आहे. पशुसंवर्धन विभागाने देशातील व राज्यातील जातीवंत गायी, म्हैशी, शेळय़ांचे जतन केले आहे. या गायी, म्हशी, शेळी पालनाकडे शेतकर्‍यांनी वळावे आणि शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. यासाठी या ठिकाणी शेतकर्‍यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे, तसेच शेतात शेततळे करून त्यात मत्स्य व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य विभागाकडून मार्गदर्शन केल्या जात आहे.  कीटकशास्त्र विभागाच्या वतीने पिकांवर येणारी कीड व त्याचे व्यवस्थापन कसे करावे, यासंबंधीची विस्तृत माहिती शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान पाहता,  कीटकशास्त्र व संशोधन विभागाने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती उपलब्ध केली आहे. संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून तंत्रशुद्ध माहिती या ठिकाणी शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. राज्यभरातून आलेले बचतगटांचे साहित्य, प्रक्रिया केलेला शेतमाल, खाद्यपदार्थ शेतकरी व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.  

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव