शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

खामगाव-जालना मार्ग ‘पीपीपी’द्वारे!

By admin | Updated: October 16, 2016 02:27 IST

खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचा घेतला आढावा.

बुलडाणा, दि. १५- खामगाव - जालना रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून, हा मार्ग खासगी विकासक भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) द्वारे उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत रेल्वे खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले. केंद्रीय योजनांचा समावेश असलेल्या दिशा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मंचावर आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. संजय रायमूलकर व चैनसुख संचेती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, मेहकर पंचायत समितीचे सभापती सागर पाटील, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.यावेळी आढावा घेताना खासदार म्हणाले, केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून विकासाचा सामाजिक समतोल साधत काम करत आहे. या संपूर्णपणे केंद्राच्या अखत्यारित असणार्‍या व केंद्र पुरस्कृत असलेल्या योजना प्रभावीपणे राबविल्या पाहिजे. या योजनांच्या माध्यमातून तळागाळातील व्यक्तीचा विकास करणे शक्य आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांंंगीण विकास करणे शक्य होईल. त्यामुळे केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदार प्रतापराप जाधव यांनी यावेळी केल्या. मनरेगामध्ये कुशल व अकुशल कामांवरचा खर्च पूर्ण झाला पाहिजे. त्याचप्रमाणे नियमानुसार कामांच्या टक्केवारीनुसार सहभाग बघून कामे घ्यावीत. कुशल कामांचे थकलेले देयके पूर्णपणे त्वरित अदा करावे. मनरेगामध्ये पशुसंवर्धन, मृद व जलसंधारण, फळबाग लागवड आदींसह विविध यंत्रणांची नियमात बसत असलेली कामे घ्यावीत. मागील काळात मंजूर असलेल्या लोणार तालुक्यातील मनरेगाच्या विहिरी पात्र आहेत; मात्र पूर्ण झाल्या नाहीत. अशा विहिरी त्वरित पूर्ण कराव्यात. जेणेकरून त्या भागातील शेतकर्‍यांना विहिरींच्या माध्यमातून सिंचनाचा लाभ होईल. ते पुढे म्हणाले, की प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत या वर्षी विमा भरलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांच्या नियुक्त समितीने पीक विमा भरलेल्या व नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना विमा कंपनी, कृषी विभाग किंवा बँक यांच्याकडे अर्ज करायला लावावा. तसेच अर्ज प्राप्त शेतकर्‍यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना मदत मिळवून द्यावी. शेतकर्‍यांनी नुकसान झाले असल्यास कृषी विभाग, ग्रामसेवक, बँक प्रतिनिधी यांच्याकडे अर्ज करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. घरकुल योजनेसंदर्भात बोगस लाभार्थी असल्याबाबत त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ८६ योजनांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापैकी १४ योजना पूर्ण करण्यात आल्या आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी विविध विभागप्रमुखांनी आपल्या खात्याच्या योजनेविषयी माहिती दिली. आमदारांनी विविध समस्या मांडल्या. बैठकीला लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे विभागप्रमुख, रेल्वेचे अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी आदींसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचलन चंद्रशेखर जोशी यांनी, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी मानले.