शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

खामगाव  : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:27 IST

गहू पिकाबरोबरच हरभरा, कांदा, मका या पिकांनाही या वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

  खामगाव: खामगाव तालुक्यात काही भागात रविवारी दुपारी झालेल्या पावसाने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात गारा सुद्धा पडल्या. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान खामगाव तालुक्यातील काही भागात अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने शेतकºयांची तारांबळ उडवून दिली. बहुतांश शिवारातील गव्हाचे पिक आडवे झाले आहे. तालुक्याच्या बहुतांश भागात रविवारी दुपारी चार सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. तासभर कमी- अधिक प्रमाणात हा पाऊस साडेपाच वाजेपर्यंत सुरूच होता. वादळी वाºयामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे पीक फडातच आडवे झाले आहे.बारीक होण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील अंत्रज, आंबेटाकळी, बोरी अडगाव, बोथाकाजी, शहापूर, कंचनपुर,अटाळी उमरा,आवार पेडका,विहिगाव, आसा, दुधा आदी भागांत हा अवकाळी पाऊस झाला. गहू पिकाबरोबरच हरभरा, कांदा, मका या पिकांनाही या वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या भागात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या पिकाचेच मोठे नुकसान झाले आहे.  अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना अद्याप शासकीय पातळीवरून पुर्णत: मदत मिळाली नाही. खरिप पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासकिय पातळीनंतर मदतीची घोषणा झाली. परंतु, शेतकरी त्यातुन आजूनही सावरला नाही. सोयाबीन, कापूस, उडिद, मूग या नगदी पिकांचे नुकसान झाले. खरीप पिकाने धोका दिल्यानंतर शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर होता. अनेक भागातील शेतकºयांनी हरभरा, गहू, कांदा, मका,या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून  वातावरणामध्ये मोठा बदल झाला आहे. हुडहुडी भरणाºया वातावरणामुळे वेगवेगळ्या आजारांनी नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे पिकांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकºयांच्या झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव