शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

शौचालय योजनेचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 12:20 IST

Khamgaon News तालुक्यात शौचालय योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात हागणदारीला नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने स्वच्छता अभियानासारख्या विविध योजना राबविल्या. शौचालय बांधकामास अनुदान दिले. मात्र, त्यानंतरही अनेक नागरीक उघड्यावर शौचास जात आहेत. परिणामी तालुक्यात शौचालय योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.ग्रामीण भागात सर्रास ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहे. सकाळच्या सुमारास ग्रामीण भागात ही बाब प्रकर्षाने जाणवते. शासनाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून नागरिकांना प्रोत्साहनावर अनुदान दिले. त्यात वेळोवेळी वाढ केली. त्यामुळे गावात शौचालयांची संख्या वाढली. मात्र ग्रामीण भागात अनेक कुटुंबियांत शौचालयाचा वापर नाममात्र होत असल्याचे दिसते. आजही ग्रामीण भागात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंब उघड्यावर शौचालय करतात, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविले जात होते. ग्रामीण भागात सामुदायिक व वैयक्तिक स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले.या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी म्हणून केंद्र शासनाने २००५ पासून संपूर्ण देशात निर्मल ग्राम योजना सुरू केली. त्याची व्याप्ती २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यात आले.त्यामुळेच २००८ मध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. यामुळे ग्रामीण भागात हगणदारी काही प्रमाणात कमी झाली. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान सुरू झाले. यात शौचालय बांधकाम करणाºयांना अनुदान दिले जाते. मात्र ग्रामीण भागात नागरिक शौचालयाचा वापर पाहिजे तशा प्रमाणात करीत नसल्याने अनेक गावाच्या स्थितीवरून दिसते. ग्रामीण भागात गावांमध्ये प्रवेश करताना नाकाला रुमाल लावावा लागतो. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना