शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय योजनेचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 12:20 IST

Khamgaon News तालुक्यात शौचालय योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात हागणदारीला नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने स्वच्छता अभियानासारख्या विविध योजना राबविल्या. शौचालय बांधकामास अनुदान दिले. मात्र, त्यानंतरही अनेक नागरीक उघड्यावर शौचास जात आहेत. परिणामी तालुक्यात शौचालय योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.ग्रामीण भागात सर्रास ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहे. सकाळच्या सुमारास ग्रामीण भागात ही बाब प्रकर्षाने जाणवते. शासनाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून नागरिकांना प्रोत्साहनावर अनुदान दिले. त्यात वेळोवेळी वाढ केली. त्यामुळे गावात शौचालयांची संख्या वाढली. मात्र ग्रामीण भागात अनेक कुटुंबियांत शौचालयाचा वापर नाममात्र होत असल्याचे दिसते. आजही ग्रामीण भागात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंब उघड्यावर शौचालय करतात, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविले जात होते. ग्रामीण भागात सामुदायिक व वैयक्तिक स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले.या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी म्हणून केंद्र शासनाने २००५ पासून संपूर्ण देशात निर्मल ग्राम योजना सुरू केली. त्याची व्याप्ती २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यात आले.त्यामुळेच २००८ मध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. यामुळे ग्रामीण भागात हगणदारी काही प्रमाणात कमी झाली. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान सुरू झाले. यात शौचालय बांधकाम करणाºयांना अनुदान दिले जाते. मात्र ग्रामीण भागात नागरिक शौचालयाचा वापर पाहिजे तशा प्रमाणात करीत नसल्याने अनेक गावाच्या स्थितीवरून दिसते. ग्रामीण भागात गावांमध्ये प्रवेश करताना नाकाला रुमाल लावावा लागतो. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना