शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खामगाव: सुरू होण्यापूर्वीच थांबली अतिक्रमण निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:39 IST

११ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणारी मोहीम अद्याप सुरू न झाल्याने पाणी कुठे मुरले याचीच चर्चा शहरात सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाचे उदासिन धोरण असल्याची ओरड होत असल्यामुळे गत आठवड्यात पालिकेने अतिक्रमण निमुर्लन मोहिम हाती घेतली. मात्र, ही मोहीम प्रारंभ होण्यापूर्वीच कुठेतरी माशी शिंकली. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणारी मोहीम अद्याप सुरू न झाल्याने पाणी कुठे मुरले याचीच चर्चा शहरात सुरू आहे.खामगाव शहराचा गत काही काळापासून झपाट्याने विस्तार होत आहे. सोबतच शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकउे बेरोजगार आणि लघू व्यावसायिक मिळेल त्या ठिकाणी आपली दुकाने थाटू लागलेत. त्यामुळे अतिक्रमणात दिवसेंदिवस भर पडत आहे. मात्र, याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, खामगाव शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेच्यावतीने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नोटीस बजावण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर तीन दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला होता. ११ फेब्रुवारी पर्यंत अतिक्रमकांना अतिक्रमण काढण्यासाठी मुदत देण्यात आली होती. अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू झाल्यानंतर ही दुकाने काढण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहर पोलिस स्टेशनसमोरील अतिक्रमण जैसे थे!जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहर पोलिस स्टेशन समोरील खाद्य पदार्थांच्या दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवघ्या तीन दिवसांत हे अतिक्रमण जैसे थे झाले आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव