शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

विहीर अधिग्रहणानंतरही घशाला कोरड !

By admin | Updated: May 15, 2017 00:02 IST

पाणीपुरवठ्याच्या योजना अर्धवट : अधिग्रहण झालेल्या विहिरींनीही गाठला तळ

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : उन्हाळा आला की तालुक्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. त्यासाठी तालुक्यात महाजल व पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत; मात्र अर्धवटच असल्याने तालुक्यातील पाणीटंचाई कायम राहत आहे. २४ गावांत ३३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, या अधिग्रहण झालेल्या विहिरींनीसुद्धा तळ गाठला आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून नेहमीप्रमाणे विविध योजनांद्वारे लाखो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र, झालेली अर्धवट कामे व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये खर्च करूनही संबंधित गावाची पाणी समस्या बंद होण्याऐवजी ती नव्याने पुन्हा तयार होत आहे. खर्च केलेला निधी ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या घशात जातो. ग्रामीण जनता मात्र तहानलेलीच राहते. हीच अवस्था तालुक्यातील अनेक गावांमध्ये आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. सदर पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत स्तरावरून विहीर अधिग्रहण, टँकर याची सुविधा करण्यात येते. ही सुविधा केवळ २ ते ४ महिन्यांपर्यंत मर्यादित असते. या २ ते ४ महिन्यांत विहीर अधिग्रहण व टँकर यांच्यावर लाखो रुपये खर्च होतो. मात्र, या लाखो रुपयांचा कायमस्वरूपी पाणी समस्या सोडविण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. त्या गावाचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटावा, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत महाजल, भारत निर्माण राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या लाखो रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. ज्या गावात या योजना राबविण्यात आल्या, त्यामध्ये या विविध योजनांद्वारे त्या गावामध्ये नवीन विहिरी खोदणे, पाइपलाइन करणे, पंपघर बांधणे, मुख्य पाइपलाइन करणे, पाण्याची वितरण व्यवस्था करणे, विद्युत कनेक्शन घेणे, पाण्याची टाकी बांधणे आदी कामे ठेकेदार व अधिकारी यांच्या टक्केवारीत अडकल्यामुळे बोगस झालेली आहेत. महाजल योजना, भारत निर्माण योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, अंतर्गत गावांमध्ये योजनांची कामे मात्र दिसत नाहीत. काही गावांत योजना शेवटच्या घटका मोजत आहेत, तर काही गावांत दहा वर्षांपासून योजना रेंगाळत आहे. मात्र, पाण्यासारखा शासनाचा पैसा खर्च करूनही गावामध्ये दरवर्षी पाणी समस्या निर्माण होत आहे. संबंधित गावात योजनेद्वारे कामे करण्यात आली, त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध व टक्केवारी असल्याने निकृष्ट झाली, तर काही ठिकाणी अर्धवट कामे असल्याने सदर योजना अयशस्वी झाल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही संबंधित गावात पाणी समस्या कायमच आहे.अधिग्रहण केलेल्या विहिरी कोसो दूर२४ गावांत ३३ विहिरी व २ बोअर अधिग्रहण करूनही पाणी प्रश्न सुटलेला नाही. ज्या विहिरी अधिग्रहण केल्या, त्याच विहिरीमध्ये पाणी कमी असल्याचे चित्र असल्यामुळे अधिग्रहण केलेल्या विहिरीमध्ये एकतर बोअरमधून किंवा दुसऱ्या विहिरीतील पाणी आणून टाकावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते किंवा विकत पाणी घ्यावे लागते. अधिग्रहण केलेल्या विहिरीचा ग्रामस्थांना पाहिजे तसा पाण्यासाठी उपयोग होताना दिसत नाही.क्षारयुक्त पाण्यामुळे वाढले आजार अधिग्रहण केलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेलेली असल्याने पाणी क्षारयुक्त असल्यामुळे पोटाच्या आजाराचे प्रमाण वाढू शकते. ज्या विहिरी अधिग्रहण केल्या आहेत, त्या एकतर गावापासून कोसो दूर आहेत. त्यांचीही पाणी पातळी खालावलेली आहे. शासनाच्या निधीचा योग्य विनियोग करून गावातीलच विहिरीमध्ये टँकरने पाणी आणून टाकले असते, तर महिलांची पायपीट झाली नसती आणि ग्रामस्थांना दररोज पाणी मिळाले असते.विहिरी अधिग्रहण केलेली गावेवझर आघाव १ , हिवराखंड १, चिंचोली सांगळे १, शारा १, येसापूर १, रायगाव १, तांबोळा १, दाभा १, देवानगर १ , किनगाव जट्टू २, भानापूर २, वडगाव तेजन १, ब्राह्मण चिकना १, पहूर १, वाल्हूर १, वेणी १, शिंदी १, भुमराळा ४ , अंजनी खुर्द २, वसंत नगर १, सोमठाणा १, सावरगाव तेली ४, उदनापूर १, कोयाळी १ विहिरी अधिग्रण केली आहे, तर बोअर अधिग्रहण केलेल्या गावांमध्ये आजीसपूर, खापरखेडचा समावेश आहे.