पंजाबराव ठाकरे /संग्रामपूरवीज, पाणी, रस्ते, शिक्षण, सांडपाणी यासह भौतिक सुविधांचा सुकाळ असलेल्या आदिवासीबहुल करमोडा ग्रामपंचायत शासकीय स्तरावरूनही दुर्लक्षित ठेवण्यात आली. दिवसभर शेतात राबून मोलमजुरी करणार्यांची संख्या अधिक असल्याने सहजासहजी गावापर्यंत पोहचणार्या योजनाच या गावांमध्ये थातूर-मातूर राबविल्याचे दिसून येते. या ग्रा.पं. अंतर्गत आदिवासी वस्तीची गावे असताना ठक्करबाप्पा योजनाही परिपक्वपणे राबविण्यात आली नाही. अत्यंत दुर्गम आणि अविकसित व दुर्लक्षित असलेल्या या ग्रा.पं.ला विकासाच्या आशेचा किरण आता आदर्श ग्राम संसद उपक्रमाच्या माध्यमातून दिसणार असे चित्र आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी या ग्रा.पं.ची केलेली निवड योग्य ठरावी, अशी परिस्थिती आहे.करमोडा या गावाला ऐतिहासिक वारसा खर्या अर्थाने राजकीय स्वरूपातूनच मिळालेला आहे. १९५२ साली या खेडेगावचे रहिवासी दिवंगत भाई के. आर. पाटील आमदार म्हणून राज्यभर चमकले आहेत. येथे एक ना अनेक समस्यांचा डोंगर आहे. आदर्श ग्राम संसद अंतर्गत हे आव्हान खासदार म्हणून प्रतापरावांना पेलावे लागणार आहे.
करमोडाचा होणार कायापालट
By admin | Updated: December 6, 2014 00:07 IST