शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी किन्होळा सरसावले

By admin | Updated: December 10, 2014 00:44 IST

ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांची घेणार भेट.

चिखली (बुलडाणा) : वारंवार पडणारा दुष्काळ, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार या विशेष कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पैनगंगेच्या काठावर असतानाही तालुक्यातील किन्होळा गावाला नेहमीच तीव्र पाणीटंचाई, दुष्काळ, तर कधी महापुराच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावचे तरुण सरपंच दीपक बाहेकर यांनी पुढाकार घेऊन ह्यजलयुक्त शिवारह्ण ही लोकचळवळ राज्यात सर्वप्रथम आपल्या गावात राबविण्यात यावा यासाठी प्रयत्नरत आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार करून त्याच्या मंजुरातीसाठी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.वारंवार येणारा दुष्काळ राज्याची प्रमुख समस्य आहे.यामुळे शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी ह्यजलयुक्त शिवारह्ण या विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे. याअंतर्गत व्यापकपणे लोकसहभागाच्या माध्यमातून राज्यात नवी चळवळ उभारण्याचा मानस मुख्यमंत्री ना. फडणवीस यांचा असून, याबाबत अधिकृत घोषणा करताच ही योजना राज्यात सर्वप्रथम आपल्या गावात राबविण्यात यावी, यासाठी तालुक्यातील किन्होळा येथील तरुण सरपंच दीपक बाहेकर सरसावले आहेत. सरपंच बाहेकर यांनी या योजनेचे महत्त्व जाणून घेत गावात ही योजना राबविण्यासाठी तातडीने प्राथमिक स्वरूपातील प्रस्तावदेखील तयार केला आहे. किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, कोलारी या परिसरातून पैनगंगा नदी वाहते. तालुक्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या पैनगंगेचा सुमारे चार किलोमीटरचा भाग या परिसरात असून, नदीचे पात्र सुमारे ३0 मीटर रुंद आहे. सन २00२, २00४, २00६ आणि २0१३ मध्ये जिल्हय़ात अतवृष्टी होऊन पैनगंगेला आलेल्या पुरामुळे या परिसरातील नदीकाठावरील पिके वाहून गेली. या समस्येवर आजवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याने नदीकाठावरील ग्रामस्थांना कायम अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. तर दर उन्हाळय़ात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाययोजनेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो.