शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी किन्होळा सरसावले

By admin | Updated: December 10, 2014 00:44 IST

ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांची घेणार भेट.

चिखली (बुलडाणा) : वारंवार पडणारा दुष्काळ, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार या विशेष कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पैनगंगेच्या काठावर असतानाही तालुक्यातील किन्होळा गावाला नेहमीच तीव्र पाणीटंचाई, दुष्काळ, तर कधी महापुराच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावचे तरुण सरपंच दीपक बाहेकर यांनी पुढाकार घेऊन ह्यजलयुक्त शिवारह्ण ही लोकचळवळ राज्यात सर्वप्रथम आपल्या गावात राबविण्यात यावा यासाठी प्रयत्नरत आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार करून त्याच्या मंजुरातीसाठी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.वारंवार येणारा दुष्काळ राज्याची प्रमुख समस्य आहे.यामुळे शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी ह्यजलयुक्त शिवारह्ण या विशेष उपक्रमाची घोषणा केली आहे. याअंतर्गत व्यापकपणे लोकसहभागाच्या माध्यमातून राज्यात नवी चळवळ उभारण्याचा मानस मुख्यमंत्री ना. फडणवीस यांचा असून, याबाबत अधिकृत घोषणा करताच ही योजना राज्यात सर्वप्रथम आपल्या गावात राबविण्यात यावी, यासाठी तालुक्यातील किन्होळा येथील तरुण सरपंच दीपक बाहेकर सरसावले आहेत. सरपंच बाहेकर यांनी या योजनेचे महत्त्व जाणून घेत गावात ही योजना राबविण्यासाठी तातडीने प्राथमिक स्वरूपातील प्रस्तावदेखील तयार केला आहे. किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, कोलारी या परिसरातून पैनगंगा नदी वाहते. तालुक्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या पैनगंगेचा सुमारे चार किलोमीटरचा भाग या परिसरात असून, नदीचे पात्र सुमारे ३0 मीटर रुंद आहे. सन २00२, २00४, २00६ आणि २0१३ मध्ये जिल्हय़ात अतवृष्टी होऊन पैनगंगेला आलेल्या पुरामुळे या परिसरातील नदीकाठावरील पिके वाहून गेली. या समस्येवर आजवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याने नदीकाठावरील ग्रामस्थांना कायम अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. तर दर उन्हाळय़ात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाययोजनेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो.