शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवसांपासून कोलद गाव अंधारात!

By admin | Updated: June 8, 2017 02:29 IST

संग्रामपूर : तालुक्यातील कोलद येथील ६३ के.व्ही. ची डीपी गेल्या आठ दिवसांपासून जळालेली असल्यामुळे १० दिवसांपासून कोलद गाव हे अंधारातच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील कोलद येथील ६३ के.व्ही. ची डीपी गेल्या आठ दिवसांपासून जळालेली असल्यामुळे १० दिवसांपासून कोलद गाव हे अंधारातच आहे; मात्र १० दिवस उलटूनही महावितरण कार्यालय संग्रामपूरकडून या गावात नवीन डीपी बसविण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.कोलद येथील महावितरण कंपनीची डीपी गत दहा दिवसांपासून बिघाड होऊन जळालेली आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. गावातील नागरिकांना रात्र-रात्र भर लाईट गुल असल्यामुळे जागरण करावे लागत आहे, तर गावातील वृद्ध तसेच लहान मुलांनासुद्धा उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घरातील कूलर, पंखे बंद पडलेले आहेत. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत व आजारी नागरिकांना घराच्या बाहेर झोपावे लागत आहे. गावातील विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे १० दिवसांपासून नळाचे पाणीही बंद आहे, तसेच गावातील पीठगिरण्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना दळण दळून आणण्यासाठी ५ ते ६ किलोमीटर दुसऱ्या गावामध्ये पीठगिरणीवर जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. १० दिवस उलटूनही महावितरण कार्यालयाकडून नवीन डीपी बसविण्यात आलेली नसल्यामुळे नागरिक रोष व्यक्त करीत आहेत, तरी संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.गत दहा दिवसांपासून गावातील डीपी जळालेली असल्यामुळे व बिघाड झालेला असल्यामुळे गाव दहा दिवसांपासून अंधारातच आहे; मात्र महावितरण कंपनीकडून त्याची कुठलीही दखल घेतल्या जात नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.- गोपाल सोनोने, सरपंच, कोलद.