शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

तीन महिन्यांत फक्त ४० दिवस खरेदी

By admin | Updated: April 24, 2017 02:52 IST

बारदान्याअभावी ५३ दिवस तूर खरेदी बंद होती, तर प्रत्यक्षात ४० दिवसच शेतकऱ्यांची तूर घेण्यात आली. यामुळे आजही हजारो क्विंटल तूर पडून आहे.

नांदुरा : तुरीची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावात सुरु झाल्याने हमीभावाने शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करू, अशी घोषणा करणाऱ्या शासनाने नांदुरा तालुक्यासाठी भारतीय खाद्य निगम (एफसीआय) च्या माध्यमातून हमीभावाने तूर खरेदी १९ जानेवारीपासून सुरू करुन २२ एप्रिल रोजी खरेदी बंद केली आहे. मात्र, या तीन महिन्यांच्या काळात बारदान्याअभावी ५३ दिवस तूर खरेदी बंद होती, तर प्रत्यक्षात ४० दिवसच शेतकऱ्यांची तूर घेण्यात आली. यामुळे आजही हजारो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात व काही मोजणीअभावी बाजार समितीत पडून आहे. तुरीचे भाव पडल्याने हमीभावासाठी भारतीय खाद्य निगमच्या माध्यमातून नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय तूर खरेदी केंद्र १९ जानेवारीला सुरू झाले. त्यावेळी तालुक्यात लेट व्हेरायटीचा पेरा जास्त असल्याने तूर विक्रीसाठी आवक कमी होती. मात्र, आवक आल्यानंतर काही दिवसातच बारदाना संपला व तूर खरेदी ठप्प झाली. बारदाना फारसा उपलब्ध होत नसल्याने बारदाना आला, तर दोन ते तीन दिवस तूर खरेदी सुरू असायची व पुन्हा बंद असे चित्र मागील तीन महिन्यांत वारंवार बाजार समितीत पाहायला मिळाले. याबाबत विचारणा केली असता मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मागील तीन महिन्यांत फक्त ४० दिवस तूर खरेदी सुरू होती व ५३ दिवस बंदच राहली. याबाबत बारदाना उपलब्ध नसणे हे प्रमुख कारण होते. त्यामुळे सतत तीन महिने तुरीची शासकीय खरेदीचा शासनाचा दावा फोल असून, प्रत्यक्षात फक्त ४० दिवस तूर खरेदी सुरु होती. या कालावधीत नांदुरा येथे फक्त २७ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. आजरोजी खरेदी बंद होणार, या भीतीने शेतकऱ्यांनी बाजार समितीत ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडे आदी वाहनांमधून तूर विक्रीसाठी आणली आहे व त्यांना मोजणीची प्रतीक्षा आहे. बाजार समिती आवारात शेतमाल ठेवायला जागा नसल्याने व यापूर्वी मोजणीसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागल्याने आजही अनेक शेतकऱ्यांची तूर घरी पडून आहे व त्यातच शासनाचे तूर खरेदी केंद्र आता बंद झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे मोजके तीन महिन्यात फक्त ४० दिवस तूर खरेदी सुरु ठेवणाऱ्या शासनाने तूर खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी व शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी हमीभावाने पुन्हा सुरु करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. बाजारपेठेत व्यापारी तुरीची खरेदी अल्पदराने करीत असल्याने शासकीय हमीभावाची खरेदी सुरु झाली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तूर विकायला दोन महिन्यांची प्रतीक्षानांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमीदर केंद्रावर बहुतांश शेतकऱ्यांच्या मालाच्या मोजणीकरिता दोन महिन्यांचा अवधी लागला आहे. बारदाना संपला, त्यानंतर आपलीच मोजणी होणार, या आशेपोटी शेतकरी दररोज बाजार समिती यार्डात मालाच्या संरक्षणासाठी बसून असत. बहुतांश शेतकरी जेवणाचा डबा व पाण्याची बॉटल घेऊन विक्रीसाठी आणलेल्या तुरीच्या गंजीवर रात्रंदिवस असत. हमीभावासाठी शेतकऱ्यांच्या या संघर्षानंतर मोजणी झाली. मात्र, आजही अनेकांच्या घरात तूर पडून असल्याने व खरेदी केंद्रच आता बंद झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.