शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

शेतकरीपुत्र झाला न्यायाधीश

By admin | Updated: March 14, 2016 01:48 IST

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अल्पभूधारक शेतक री पुत्राची यशोगाथा.

मयूर गोलेच्छा /लोणार निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती सातत्याने तोट्यात येत असून, अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताना शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. एकीकडे मुलांचे शिक्षण, लग्न, वाढते कर्ज अशा संकटात जगणे असह्य झाल्यामुळे जिथे काही शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, त्याच ठिकाणी तालुक्यातील धायफळ येथील अल्पभूधारक शेतकरी सत्यभान मानकर यांच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्या मुलाचे नाव आहे, रवी सत्यभान मानकर.लोणार तालुक्यातील धायफळ येथील सत्यभान धारोजी मानकर यांच्याकडे ५ एकर जमीन असून, ती कोरडवाहू आहे. त्यामुळे जमिनीतून फार काही उत्पादन होत नाही. घरची परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी मुलांच्या शिक्षणावर भर दिला. सत्यभान मानकर यांना वसंता आणि रवी ही दोन मुले. दोघांचेही प्राथमिक शिक्षण गावातील जि.प. शाळेत व त्यानंतरचे शिक्षण लोणार येथील महाराणा प्रताप हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. रवी हा अभ्यासात हुशार होता. परंतु, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने रवीच्या भावाने आपले शिक्षण थांबविले आणि लहान भावाला पुढच्या शिक्षणासाठी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ विद्यापीठात पाठविले. यावेळी रवीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी मोठय़ा भावाने सांभाळली. दरम्यान, वसंता याचे हृदयविकाराने निधन झाले. अशा परिस्थितीत न डगमगता मिळेल ते काम करून रवीने शिक्षण पूर्ण केले. तसेच लोकसेवा आयोगामार्फत न्यायाधीश पदाची परीक्षा दिली. त्यात चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाल्याने रवीची न्यायाधीश पदावर निवड झाली. मुलाच्या यशामुळे वडिलांच्या डोळय़ात एकीकडे आनंदाचे तर दुसरीकडे धाकट्या मुलाच्या आठवणीने दु:खाचे अश्रू तरळत होते.