शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

जॉबकार्ड, आधार जोडणीत जिल्हा अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:20 IST

थेट मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होण्याच्या दृष्टीने  मनरेगामध्ये काम करणार्‍या मजुरांचे जॉब कार्ड, आधारकार्ड त्यांच्या बँक खा त्याशी लिंक करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

ठळक मुद्देमनरेगामध्ये काम करणार्‍या मजुरांच्या फसवणुकीस बसेल आळा!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : थेट मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होण्याच्या दृष्टीने  मनरेगामध्ये काम करणार्‍या मजुरांचे जॉब कार्ड, आधारकार्ड त्यांच्या बँक खा त्याशी लिंक करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.दोन वर्षांपूर्वी मनरेगावरील मजुरी न मिळाल्याने तथा फसवणूक झाल्याने बुलडाणा  जिल्ह्यातील लोणार तालुका पाच मजुरांच्या आत्महत्यांमुळे राज्यात चर्चेत आला  होता. त्यामुळे लोणार तालुक्यात ओडीसा आणि ठाणे येथील संस्थांनी केंद्राच्या  निर्देशानंतर येऊन थेट सामाजिक अंकेक्षणही करीत तब्बल १७ हजार मजुरांचे  अर्जही भरून घेतले होते. या कटू अनुभवातून बाहेर पडत आजच्या तारखेत  बुलडाणा जिल्हा राज्यात जॉब कार्ड, आधार कार्ड थेट मजुरांच्या बँक खात्यांशी  लिंक करण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. ९९.७४ टक्के मजुरांचे आधार  कार्ड आणि जॉब कार्ड लिंक होऊन बँक खात्याशी जोडले गेले आहेत.मनरेगांतर्गत बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ३३ हजार ४८८ मजुरांनी नोंदणी  केलेली आहे. यापैकी एक लाख २१ हजार ८४७ मजुरांचे आधार कार्डची पड ताळणी झाली आहे. एक लाख दोन हजार ९१३ मजुरांच्या आधारकार्ड, जॉबकार्ड  आणि बँक खात्याचे लिंकिंग झालेले आहे.त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील मजुरांच्या थेट खात्यात त्यांची मजुरी जमा होत  आहे. वर्तमान स्थितीत मनरेगांतर्गत २0१ रुपये मजुरी दिली जाते. तिन्ही बाबींची  लिंकींग झाल्यामुळे थेट मजुराच्या खात्यात त्याची मजुरी पडत असल्याने त्याची  फसवणूक होण्याचा धोका  टाळण्यास मदत मिळत आहे.

पुढारलेले जिल्हे मागेमजुरांचे जॉबकार्ड, आधार आणि बँक खाते लिंक करण्याच्या बाबतीत राज्यातील  पुढारलेले जिल्हे मागे आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा याबाबत सध्या  दुसर्‍या तर नागपूर जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर आहे. अकोला जिल्हा हा चौथ्या  क्रमांकावर आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर, रायगड आणि बुलडाणा  जिल्ह्यालगतचा जालना जिल्हा तळाकडून अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे  आणि पाचवे आहेत.

मजुरांचे स्थलांतर समस्याबुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने लोणार या मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या  तालुक्यातून मोठय़ा प्रमाणावर औरंगाबाद, सुरत, मुंबई, ठाणे या भागात स्थलांतर  पूर्वी होत होते. जादा मजुरी औद्योगिक क्षेत्रात मिळत, म्हणून येथील मजूर प्रामुख्याने  त्या भागात जातात;परंतु अलिकडील काळात त्यात आता कमी आली आहे.  सामाजिक अंकेक्षण आणि काम ‘दो फॉर्म’ भरल्यानंतर या स्थितीत बर्‍यापैकी  फरक पडल्याचे चित्र आहे.