शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

जॉबकार्ड, आधार जोडणीत जिल्हा अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:20 IST

थेट मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होण्याच्या दृष्टीने  मनरेगामध्ये काम करणार्‍या मजुरांचे जॉब कार्ड, आधारकार्ड त्यांच्या बँक खा त्याशी लिंक करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

ठळक मुद्देमनरेगामध्ये काम करणार्‍या मजुरांच्या फसवणुकीस बसेल आळा!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : थेट मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होण्याच्या दृष्टीने  मनरेगामध्ये काम करणार्‍या मजुरांचे जॉब कार्ड, आधारकार्ड त्यांच्या बँक खा त्याशी लिंक करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.दोन वर्षांपूर्वी मनरेगावरील मजुरी न मिळाल्याने तथा फसवणूक झाल्याने बुलडाणा  जिल्ह्यातील लोणार तालुका पाच मजुरांच्या आत्महत्यांमुळे राज्यात चर्चेत आला  होता. त्यामुळे लोणार तालुक्यात ओडीसा आणि ठाणे येथील संस्थांनी केंद्राच्या  निर्देशानंतर येऊन थेट सामाजिक अंकेक्षणही करीत तब्बल १७ हजार मजुरांचे  अर्जही भरून घेतले होते. या कटू अनुभवातून बाहेर पडत आजच्या तारखेत  बुलडाणा जिल्हा राज्यात जॉब कार्ड, आधार कार्ड थेट मजुरांच्या बँक खात्यांशी  लिंक करण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. ९९.७४ टक्के मजुरांचे आधार  कार्ड आणि जॉब कार्ड लिंक होऊन बँक खात्याशी जोडले गेले आहेत.मनरेगांतर्गत बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ३३ हजार ४८८ मजुरांनी नोंदणी  केलेली आहे. यापैकी एक लाख २१ हजार ८४७ मजुरांचे आधार कार्डची पड ताळणी झाली आहे. एक लाख दोन हजार ९१३ मजुरांच्या आधारकार्ड, जॉबकार्ड  आणि बँक खात्याचे लिंकिंग झालेले आहे.त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील मजुरांच्या थेट खात्यात त्यांची मजुरी जमा होत  आहे. वर्तमान स्थितीत मनरेगांतर्गत २0१ रुपये मजुरी दिली जाते. तिन्ही बाबींची  लिंकींग झाल्यामुळे थेट मजुराच्या खात्यात त्याची मजुरी पडत असल्याने त्याची  फसवणूक होण्याचा धोका  टाळण्यास मदत मिळत आहे.

पुढारलेले जिल्हे मागेमजुरांचे जॉबकार्ड, आधार आणि बँक खाते लिंक करण्याच्या बाबतीत राज्यातील  पुढारलेले जिल्हे मागे आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा याबाबत सध्या  दुसर्‍या तर नागपूर जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर आहे. अकोला जिल्हा हा चौथ्या  क्रमांकावर आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर, रायगड आणि बुलडाणा  जिल्ह्यालगतचा जालना जिल्हा तळाकडून अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे  आणि पाचवे आहेत.

मजुरांचे स्थलांतर समस्याबुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने लोणार या मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या  तालुक्यातून मोठय़ा प्रमाणावर औरंगाबाद, सुरत, मुंबई, ठाणे या भागात स्थलांतर  पूर्वी होत होते. जादा मजुरी औद्योगिक क्षेत्रात मिळत, म्हणून येथील मजूर प्रामुख्याने  त्या भागात जातात;परंतु अलिकडील काळात त्यात आता कमी आली आहे.  सामाजिक अंकेक्षण आणि काम ‘दो फॉर्म’ भरल्यानंतर या स्थितीत बर्‍यापैकी  फरक पडल्याचे चित्र आहे.