शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जीप- अ‍ॅपेची धडक; दोन ठार, १२ जखमी

By admin | Updated: May 18, 2017 19:31 IST

मोताळा-नांदुरा मार्गावरील घटना

ऑनलाइन लोकमत

मोताळा: नांदूरा ते मोताळा मार्गावर वरूड फाट्यानजीक महिंद्रा पीक अप जीव व अ‍ॅपेमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार तर बारा जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९:३० वाजता घडली.मोताळा येथील मोहम्मद बशीर (पिर साहब) हे आपल्या कुटुंबियांसमवेत अ‍ॅपे क्रमांक एम. एच. २८ आर ३३८६ ने १८ मे रोजी नांदुऱ्याकडे निघाले होते. दरम्यान वरूड फाट्यानजीक सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नांदुऱ्याकडून काही व्यापारी महिंद्रा पिक अप क्रमांक एम. एच. २८ एबी १९७६ मधून मोताळ्याकडे येत होते. दरम्यान रस्त्यात असलेला खडडा् चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महिंद्रा पिकअप दोन पलट्या खाऊन समोरून येणाऱ्या अ‍ॅपेवर जाऊन आदळली. या अपघातात अ‍ॅपेमधील इदुलनिसाबी महमुददुीन (वय ३५) रा. जबलपूर व महिंद्रा पिकअपमधील महम्मद आरिफ अब्दुल रशीद रा. नांदुरा (मोतीनगर) हे ठार झाले. तर अ‍ॅपे व महिंद्रा पिकअप वाहनामधील १२ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मोताळा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी उपरोक्त दोन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित जखमींना तत्काळ विविध वाहनांद्वारे बुलडाणा येथील रूग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. जखमीपैकी एकास बुलडाणा येथून औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान तहसीलदार वैशाली देवकर, संग्रामपूरचे तहसीलदार एल. के.  चव्हाण व मोताळा तहसीलदार रूपेश खंडारे यांनी रूग्णालयात येवून घटनेची माहिती व विचारपुस केली. अपघातात अ‍ॅपेचा चुराडा झाला असून, अ‍ॅपे व महिंद्रा पिकअपमधील जखमींच्या हात, पाय व तोंडाला गंभीर मार लागला आहे. जखमींमध्ये ६ व १६ वर्षांची मुलगी असून, सहा वर्षाच्या मुलीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. अ‍ॅपेमधील मृतक महिला(जबलपूर) ही मोताळा येथे आपल्या भावाकडे पाहुणी म्हणून आली होती. मालवाहूमध्ये मोताळ्याच्या आठवडी बाजारासाठी येत असलेले व्यापारी व त्यांचा कांदा, लसणाचा माल होता. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी असलमशाह वजीरशाह  वय २५ रा. मोताळा यांनी बोराखेडी ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून पोलिसांनी महिंद्रा पिकअपच्या चालकाविरूद्ध कलम २७९, ३३७, ३०४ अ, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकां गजानन वाघ करीत आहे.