शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

जयस्तंभ चौकातील नियोजित स्थळी प्रतीके नव्हे, महापुरुषांचे पुतळे उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST

यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे की, सामाजिक, न्याय, समता आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी महापुरुषांनी जिवाचे रान केले. त्यामुळे ...

यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे की, सामाजिक, न्याय, समता आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी महापुरुषांनी जिवाचे रान केले. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा घेत असतो. त्याच अनुषंगाने महापुरुषांच्या स्मृती म्हणजे त्यांचे पुतळे होते. शहरातील जयस्तंभ चौकातील जागेवर जिल्हा परिषदेने ठराव पारित करून येथे पुतळे उभारावे व त्यांच्या देखभालीसाठी तथा संरक्षणासाठी बुलडाणा पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. असे असताना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रतीकांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने जयस्तंभ चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान हाती घेतलेला पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा माँ जिजाऊंसमवेतचा पुतळा, तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या मशालधारी पुतळ्याची उभारणी करावी असे नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन जयस्तंभ चौकात प्रतीके नव्हे तर महामानवांच्या पुतळ्यांची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, आमदार संजय गायकवाड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. या निवेदनावर दिलीप जाधव, ॲड. सुमित सरदार, राहुल सुरडकर, सुनील मोरे, ॲड. राहुल दाभाडे, दीपक मोरे, संजय जाधव, सुनील मोरे, शैलेश खेडेकर, रामेश्वर गाडेकर, दीपक मन्वर, बाला राऊत, सुनील तिजारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.