शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

नळगंगा नदीपात्रातील जलपर्णी काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 13:56 IST

निवेदनाची दखल घेत नदीपात्रातील जलपर्णी वनस्पती काढण्याच्या कामाला प्रत्यक्षात १२ मे पासून प्रारंभ केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नळगंगा नदी पात्र जलपर्णी वनस्पतीच्या वेढ्यात सापडले असून या वनस्पतीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर पालिका प्रशासनाला निवेदन देवून सदर नदीपात्रातील जलपर्णी वनस्पती तात्काळ काढण्यात यावी अन्यथा २७ मे पासून अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा इशारा देताच नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ यांनी या निवेदनाची दखल घेत नदीपात्रातील जलपर्णी वनस्पती काढण्याच्या कामाला प्रत्यक्षात १२ मे पासून प्रारंभ केला आहे.विदर्भाच्या प्रवेशद्वारी नळगंगा नदीचे पात्र जलपर्णी वनस्पतीच्या वेढ्यात सापडले असून यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ही जलपर्णी वनस्पती मानवी आरोग्यास धोकादायक असून या वनस्पतीमुळे नदी पात्राच्या आजू-बाजूला वसलेल्या सालीपुरा, काशीपुरा, दुर्गानगर, भीमनगर, माता महाकाली नगर, बारादरी, मोहनपुरा अशा विविध भागात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून जंतू पसरले होते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्याचप्रमाणे ही वनस्पती विषारी असून पाणी संपविण्याचे काम करते.या जलपर्णी वनस्पतीचे बियाणे पावसाळ्यापुर्वी वाढत गेल्यास मलकापूर शहराला व ग्रामीण भागातील ३८ गावांसाठीच्या नळयोजना कार्यान्वीत असलेल्या पुणार्माय नदीपात्रापर्यंत जावून याचा परिणाम या पाणी पुरवठा योजनांवर होवून ही पाणी संपविणारी वनस्पती आरोग्यास हानीकारक ठरू शकते. तसेच नळगंगा नदीचे पात्र जलपर्णी वनस्पतीने व्यापल्याने नदीकाठच्या परिसरातील गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या हितास्तव प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ३ मे रोजी न.प. प्रशासनाला निवेदन देवून सदरची जलपर्णी वनस्पती तात्काळ काढण्यात यावी, अन्यथा २७ मे पासून अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.सदर निवेदनाची न.प. प्रशासनाने तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ यांनी या भागाची पाहणी करीत नदीपात्रातील जलपर्णी वनस्पती काढण्याच्या कामाला आज १२ मे पासून प्रत्यक्षात सुरूवात केली. या सुरू असलेल्या कामाची पाहणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप, बलराम बावस्कार, अनिल पाटील आदींनी केली.‘लोकमत’ने सर्वप्रथम वेधलं लक्ष..!मलकापूरातील नळगंगा नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतींचा वेढा या विषयावर लोकमतने सर्वप्रथम लक्ष वेधले होते.त्या नंतरच्या काळात प्रहारने वारंवार पाठपुरावा केल्याने पालिका प्रशासनाने अखेर आज जलपर्णी वनस्पती नष्ट करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Malkapurमलकापूरkhamgaonखामगाव