शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

जळगाव जामोद : श्री सखाराम महाराज पालखीचे पंढपूरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:49 IST

जळगाव जामोद :  टाळ मृदंगाचा निनाद व हरीनामाच्या गजरात सखारामपुर (इलोरा) संस्थान येथून श्री संत सखाराम महाराजांची पालखी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.

ठळक मुद्देराजवैभवी थाटात इलोरा (सखारामपुर) येथून श्री सखाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान सुरू झाले. या पालखी सोहळ्यात १५० वारकरी सहभागी असून सोपानबुवा हे पालखीचे मुख्य चालक आहे. वारकरी मार्गस्थ होत असताना पंढरीच्या विठ्ठलाची ओढ भाविकांच्या  अंतकरणात दिसून येत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद :  टाळ मृदंगाचा निनाद व हरीनामाच्या गजरात सखारामपुर (इलोरा) संस्थान येथून श्री संत सखाराम महाराजांची पालखी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो स्त्री-पुरूष भाविकांनी वारकºयांचे दर्शन घेत ‘श्रीं’च्या पालखीला भक्तीभावाने निरोप दिला.यावेळी ‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी’, काय करावी साधने फल अवघेची देणे’ या अभंगांच्या गजराने  संपुर्ण आसमंत दुमदुमूला.  सर्वप्रथम संस्थानचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज व मलकापूर मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी श्री संत सखाराम महाराजांच्या मुर्तीचे व पालखीतील पादुकांचे पुजन केले. त्यानंतर बँड, पताका, घोडे, टाळकरी, विणेकरी, मृदंग वादक अशा राजवैभवी थाटात इलोरा (सखारामपुर) येथून श्री सखाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान सुरू झाले. विठ्ठल माझा माझा, मी विठ्ठलाचा’ या अभंगाने वारकरी मार्गस्थ होत असताना पंढरीच्या विठ्ठलाची ओढ भाविकांच्या  अंतकरणात दिसून येत होती.या पालखी समवेत श्री सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष तुकाराम महाराज, आ.चैनसुख संचेती, संस्थानचे व्यवस्थापक श्रीकृष्णदादा पाटील, भैय्याभाऊ बकाल, गजाननबापु देशमुख, नानासाहेब शित्रे पाटील, राजु ठाकरे, नितीन महाराज, संतोष महाराज, महादेव महाराज, बाबुराव पाटील, संतोष पाटील यांनी भास्तनपर्यंत पायीवारी केली. या पालखी सोहळ्यात १५० वारकरी सहभागी असून सोपानबुवा हे पालखीचे मुख्य चालक आहे. शुक्रवारी सकाळी ८ वा. इलोºयावरून या पालखीचे प्रस्थान झाले.

सव्वाशे वर्षाची परंपराबुलडाणा जिल्ह्यात सर्वात आधी पंढरीची पायीवारी करणारी ही पालखी समजली जाते. श्री संत सखाराम महाराजांनी स्वत:  तब्बल ६० वर्षे पंढरीची पायीवारी केली. तसेच त्यांनी बुलडाणा, अकोला, जळगाव खान्देश, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पायी फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. अशिक्षित असलेल्या सखाराम महाराजांना ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत आदी सर्व ग्रंथ मुखोदगत होते. श्री संत सखाराम महाराजांनंतर पंढरीच्या पायीवारीची परंपरा गुरूवर्य श्रीराम महाराज (बोवासाहेब) यांनी कायम ठेवली.  सध्या संस्थानचे अध्यक्ष तुकाराम महाराज हिच परंपरा पुढे चालवित असल्याने या पंढरीच्या पायीवारीला सव्वाशे वर्षाचा इतिहास निर्माण झाला आहे.माऊलीची जी पायीवारी आळंदीवरून निघते त्यामध्ये तुकाराम महाराजांचा पंढरीची पायीवारी करतात. विशेष म्हणजे  पाच वर्षापुर्वी तुकाराम महाराजांनी आजारी असतांनाही वारीत खंड पडू दिला नाही. या माऊलीच्या वारीत श्री संत सखाराम महाराज संस्थानला विशेष स्थान असून एका फडावर हभप तुकाराम महाराज यांची किर्तनसेवा असते. यामुळे जळगाव तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या सर्व वारकºयांपर्यंत पोहचले आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद