शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

जळगाव जामोद : श्री सखाराम महाराज पालखीचे पंढपूरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:49 IST

जळगाव जामोद :  टाळ मृदंगाचा निनाद व हरीनामाच्या गजरात सखारामपुर (इलोरा) संस्थान येथून श्री संत सखाराम महाराजांची पालखी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.

ठळक मुद्देराजवैभवी थाटात इलोरा (सखारामपुर) येथून श्री सखाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान सुरू झाले. या पालखी सोहळ्यात १५० वारकरी सहभागी असून सोपानबुवा हे पालखीचे मुख्य चालक आहे. वारकरी मार्गस्थ होत असताना पंढरीच्या विठ्ठलाची ओढ भाविकांच्या  अंतकरणात दिसून येत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद :  टाळ मृदंगाचा निनाद व हरीनामाच्या गजरात सखारामपुर (इलोरा) संस्थान येथून श्री संत सखाराम महाराजांची पालखी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो स्त्री-पुरूष भाविकांनी वारकºयांचे दर्शन घेत ‘श्रीं’च्या पालखीला भक्तीभावाने निरोप दिला.यावेळी ‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी’, काय करावी साधने फल अवघेची देणे’ या अभंगांच्या गजराने  संपुर्ण आसमंत दुमदुमूला.  सर्वप्रथम संस्थानचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज व मलकापूर मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी श्री संत सखाराम महाराजांच्या मुर्तीचे व पालखीतील पादुकांचे पुजन केले. त्यानंतर बँड, पताका, घोडे, टाळकरी, विणेकरी, मृदंग वादक अशा राजवैभवी थाटात इलोरा (सखारामपुर) येथून श्री सखाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान सुरू झाले. विठ्ठल माझा माझा, मी विठ्ठलाचा’ या अभंगाने वारकरी मार्गस्थ होत असताना पंढरीच्या विठ्ठलाची ओढ भाविकांच्या  अंतकरणात दिसून येत होती.या पालखी समवेत श्री सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष तुकाराम महाराज, आ.चैनसुख संचेती, संस्थानचे व्यवस्थापक श्रीकृष्णदादा पाटील, भैय्याभाऊ बकाल, गजाननबापु देशमुख, नानासाहेब शित्रे पाटील, राजु ठाकरे, नितीन महाराज, संतोष महाराज, महादेव महाराज, बाबुराव पाटील, संतोष पाटील यांनी भास्तनपर्यंत पायीवारी केली. या पालखी सोहळ्यात १५० वारकरी सहभागी असून सोपानबुवा हे पालखीचे मुख्य चालक आहे. शुक्रवारी सकाळी ८ वा. इलोºयावरून या पालखीचे प्रस्थान झाले.

सव्वाशे वर्षाची परंपराबुलडाणा जिल्ह्यात सर्वात आधी पंढरीची पायीवारी करणारी ही पालखी समजली जाते. श्री संत सखाराम महाराजांनी स्वत:  तब्बल ६० वर्षे पंढरीची पायीवारी केली. तसेच त्यांनी बुलडाणा, अकोला, जळगाव खान्देश, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पायी फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. अशिक्षित असलेल्या सखाराम महाराजांना ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत आदी सर्व ग्रंथ मुखोदगत होते. श्री संत सखाराम महाराजांनंतर पंढरीच्या पायीवारीची परंपरा गुरूवर्य श्रीराम महाराज (बोवासाहेब) यांनी कायम ठेवली.  सध्या संस्थानचे अध्यक्ष तुकाराम महाराज हिच परंपरा पुढे चालवित असल्याने या पंढरीच्या पायीवारीला सव्वाशे वर्षाचा इतिहास निर्माण झाला आहे.माऊलीची जी पायीवारी आळंदीवरून निघते त्यामध्ये तुकाराम महाराजांचा पंढरीची पायीवारी करतात. विशेष म्हणजे  पाच वर्षापुर्वी तुकाराम महाराजांनी आजारी असतांनाही वारीत खंड पडू दिला नाही. या माऊलीच्या वारीत श्री संत सखाराम महाराज संस्थानला विशेष स्थान असून एका फडावर हभप तुकाराम महाराज यांची किर्तनसेवा असते. यामुळे जळगाव तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या सर्व वारकºयांपर्यंत पोहचले आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद