शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

जळगाव व खामगाव एस.टी.आगाराची शटल सेवा

By admin | Updated: April 17, 2017 00:40 IST

अवैध प्रवासी वाहतुकीला रोखण्यासाठी एस.टी.महामंडळाचा उपक्रम

जयदेव वानखडे - जळगाव जामोददिवसेंदिवस वाढत चाललेली अवैध खासगी प्रवासी वाहतूक एस.टी. महामंडळासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यावर वारंवार उपाय शोधून नियम बनवूनही एसटी आतापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात लगाम लावू शकली नाही. त्यासाठी एसटी महामंडळ राबवित असलेल्या शटल सेवेचा शुभारंभ १५ एप्रिलपासून जळगाव जामोद व खामगाव आगाराने केला आहे. या उपक्रमामुळे प्रवासी निश्चितच एसटीकडे वळतील आणि अवैध खासगी वाहतुकीला लगाम लागेल, अशी शक्यता आहे.या शटल सेवा उपक्रमांतर्गत दररोज जळगाव जामोद आगारामधून दर अर्ध्यातासाचे फरकाने सकाळी पहिली बस ७ वाजता, दुसरी बस ७.३० वाजता आणि तिसरी बस ८ वाजता, अशा ३ बसगाड्या सोडण्यात येतील. प्रत्येक बस दिवसभरात चार फेऱ्या पूर्ण करेल, अशा पद्धतीने ३ बसेस दिवसभर १२ फेऱ्या खामगावकरिता पूर्ण करेल. याचप्रमाणे दुसरीकडे खामगाव आगारामधून खामगाव आगाराच्या तीन एसटी बसेस सकाळी ७ वाजता, दुसरी बस ७.३० वाजता आणि तिसरी एसटीबस ९ वाजता जळगाव जामोदकरिता सुटणार आहे. दर अर्ध्या तासाच्या फरकाने ह्या बसेस सुद्धा दिवसभरात १२ फेऱ्या जळगावकरिता पूर्ण करणार आहे. एकंदर दिवसभरात जळगाव जामोद आगाराच्या १२ आणि खामगाव आगाराच्या १२, अशा एकूण २४ बसफेऱ्या पूर्ण होणार आहेत. त्यामुळे निश्चितच प्रवाशांना थांबावे लागणार नाही.प्रवाशांचा वेळही वाया जाणार नाही आणि पैसेसुद्धा वाचतील. म्हणूनच शटल सेवा दोन्ही आगाराचे उत्पन्न वाढविण्यास मदत करेल आणि अवैध खासगी प्रवासी वाहतुकीलाही लगाम लागेल, असा विश्वास एसटी महामंडळाला आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्या, लग्नसराईची धामधूम पाहता एसटीची शटल सेवा ही प्रवासी वर्गासाठी महत्त्वाची ठरेल.बस थांबली नाही, तर तक्रार करा!शटल सेवा उपक्रम अंतर्गत २४ फेऱ्या करणाऱ्या बसेस जळगाव ते खामगाव दरम्यान सर्व बसथांब्यावर थांबतील आणि जर ही बस कोणत्याही बसथांब्यावर थांबली नाही, तर खामगाव आगारप्रमुख एस.एम. वानेरे, बसस्थानक प्रमुख व्ही.ए. दलाल, जळगाव जमाोद आगारप्रमुख पी.पी.शिंदे , जळगाव बसस्थानक प्रमुख वांदे यांच्याकडे तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले. खामगाव ते मेहकर शटल सेवा उपक्रमास प्रारंभखामगाव अगाराच्यावतीने मेहकरकरिता याप्रमाणे शटल सेवा प्रारंभ १५ एप्रिल रोजी करण्यात आला. या अंतर्गत खामगाव आगारामधून ४ एसटी बस गाड्या सकाळी ६ नंतर दर अर्ध्या तासाच्या फरकाने सोडण्यात येतील तर दुपारी जाणाऱ्या नाईट आऊटच्या बसेस ह्या ४ ही गाड्या मेहकर मुक्कामी राहतील. व दुसऱ्या दिवशी सकाळी परत ठरल्या शेड्युलप्रमाणे ह्या एस.टी.बसेस प्रवाशांकरिता उपलब्ध राहतील. याचप्रमाणे मेहकर आगारामधून सुद्धा अशीच सेवा १७ एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक वानेरे यांनी दिली. यामुळे दोन्ही आगाराच्या बसेस दिवसभरात २४ फेऱ्या करतील त्यामुळे निश्चीतच लग्नसराईच्या धामधुमीत प्रवाशांकरिता सुविधा एस.टी.महामंडळाने करुन दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी जिवघेणी अवैध खासगी प्रवासी वाहतूक टाळून एस.टी.चा सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन आगारप्रमुख शिंदे, वनारे यांनी केले आहे.