शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जैन संघटना-प्रशासनाच्या सहकार्यातून जिल्हा दुष्काळमुक्त होणार - पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 13:50 IST

भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री रणजित पाटील बोलत होते. अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.

अकोला : जलसंधारणाच्या कामात भारतीय जैन संघटनेचे काम अत्यंत कौतुकास्पद असून, सुजलाम-सुफलाम अकोला अभियान अंतर्गत जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ही संघटना जलसंधारणाच्या कामांकरिता विनामूल्य मशीन्स उपलब्ध करून देणार आहे. या संधीचे सोने करण्यात येणार असून, भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली.सुजलाम-सुफलाम अकोला अभियानांतर्गत मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री रणजित पाटील बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आ. गोवर्धन शर्मा, आ. बळीराम सिरस्कार, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर गांधी, जिल्हा अध्यक्ष सुभाष गादिया उपस्थित होते. पृथ्वीतलावर पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे, असे सांगत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामध्ये शासन, प्रशासनासोबतच लोकसहभागाचा मोठा वाटा आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी भारतीय जैन संघटनेने केलेले सहकार्य बहुमूल्य असून, जलसंधारणाच्या कामांसाठी ठरविण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करुन अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांचीही यावेळी समयोचित भाषणे झालीत. कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डब्ल्यू.बोके जिल्ह्यातील प्रस्तावित जलसंधारणाच्या कामांचे सादरीकरण केले. जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी जलसंधारणाच्या कामांसाठी तांत्रिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, जलसंधारण विभागाच्या उपअभियंता क्षितिजा गायकवाड, कृषी अधिकारी ढगे, भारतीय जैन संघटनेचे बुलडाणा जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांनी जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन प्रकाश अंधारे यांनी, तर आभार उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील