शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जैन संघटना-प्रशासनाच्या सहकार्यातून जिल्हा दुष्काळमुक्त होणार - पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 13:50 IST

भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री रणजित पाटील बोलत होते. अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.

अकोला : जलसंधारणाच्या कामात भारतीय जैन संघटनेचे काम अत्यंत कौतुकास्पद असून, सुजलाम-सुफलाम अकोला अभियान अंतर्गत जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ही संघटना जलसंधारणाच्या कामांकरिता विनामूल्य मशीन्स उपलब्ध करून देणार आहे. या संधीचे सोने करण्यात येणार असून, भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली.सुजलाम-सुफलाम अकोला अभियानांतर्गत मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री रणजित पाटील बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आ. गोवर्धन शर्मा, आ. बळीराम सिरस्कार, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर गांधी, जिल्हा अध्यक्ष सुभाष गादिया उपस्थित होते. पृथ्वीतलावर पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे, असे सांगत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामध्ये शासन, प्रशासनासोबतच लोकसहभागाचा मोठा वाटा आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी भारतीय जैन संघटनेने केलेले सहकार्य बहुमूल्य असून, जलसंधारणाच्या कामांसाठी ठरविण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करुन अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांचीही यावेळी समयोचित भाषणे झालीत. कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डब्ल्यू.बोके जिल्ह्यातील प्रस्तावित जलसंधारणाच्या कामांचे सादरीकरण केले. जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी जलसंधारणाच्या कामांसाठी तांत्रिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, जलसंधारण विभागाच्या उपअभियंता क्षितिजा गायकवाड, कृषी अधिकारी ढगे, भारतीय जैन संघटनेचे बुलडाणा जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांनी जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन प्रकाश अंधारे यांनी, तर आभार उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील