शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

जैन संघटना-प्रशासनाच्या सहकार्यातून जिल्हा दुष्काळमुक्त होणार - पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 13:50 IST

भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री रणजित पाटील बोलत होते. अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.

अकोला : जलसंधारणाच्या कामात भारतीय जैन संघटनेचे काम अत्यंत कौतुकास्पद असून, सुजलाम-सुफलाम अकोला अभियान अंतर्गत जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ही संघटना जलसंधारणाच्या कामांकरिता विनामूल्य मशीन्स उपलब्ध करून देणार आहे. या संधीचे सोने करण्यात येणार असून, भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली.सुजलाम-सुफलाम अकोला अभियानांतर्गत मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री रणजित पाटील बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आ. गोवर्धन शर्मा, आ. बळीराम सिरस्कार, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर गांधी, जिल्हा अध्यक्ष सुभाष गादिया उपस्थित होते. पृथ्वीतलावर पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे, असे सांगत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामध्ये शासन, प्रशासनासोबतच लोकसहभागाचा मोठा वाटा आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी भारतीय जैन संघटनेने केलेले सहकार्य बहुमूल्य असून, जलसंधारणाच्या कामांसाठी ठरविण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करुन अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांचीही यावेळी समयोचित भाषणे झालीत. कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डब्ल्यू.बोके जिल्ह्यातील प्रस्तावित जलसंधारणाच्या कामांचे सादरीकरण केले. जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी जलसंधारणाच्या कामांसाठी तांत्रिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, जलसंधारण विभागाच्या उपअभियंता क्षितिजा गायकवाड, कृषी अधिकारी ढगे, भारतीय जैन संघटनेचे बुलडाणा जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांनी जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन प्रकाश अंधारे यांनी, तर आभार उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील