शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकात्मतेप्रती जागृत असणे युवा पिढीची जबाबदारी - सलाउद्दिन शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 18:07 IST

राष्ट्रीय कौमी एकताचे दूत सल्लाउद्दीन शेख यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आजच्या काळातील काही अप्रिय घटनांमुळे सर्व धर्म समभावाची जपणूक करणारे भारतातील बुध्दीजीवी चिंतेत आहे. मात्र, आपसी मतभेद मिटवून समाजात एकात्मतेची ज्योत पेटविण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. जाती, पंथ आणि मतभेद मिटविण्यासाठी भावी युवापिठी सक्षम आहे, असा आपला ठाम विश्वास आहे. राष्ट्रीय कौमी एकताचे दूत सल्लाउद्दीन शेख यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेच्या कायार्ला सुरूवात कशी झाली?उत्तर - आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील काही निवेदकांची हुबेहुब नकल करून कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करायचो. मात्र, काही वडीलधाऱ्यांनी सल्ला दिला की निवेदन करताना दुसºयाची नकल करण्याऐवजी स्वत:ची शैली निर्माण करा. सुरूवातीला वाईट वाटले पण.. वडील धाऱ्यांचा हाच गुरूमंत्र मला कालातंराने सामाजिक एकतेकडे घेऊन गेला.

प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व पटविण्यासाठी कोठे-कोठे गेलात?उत्तर - विविध सामाजिक कार्यक्रमांचे निवेदन, सुत्रसंचालन करताना अनेक ठिकाणी जाण्याचे योग आले. मात्र, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘दूत’ म्हणून दिल्ली, भोपाळ, आग्रा, तेलंगाणा, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई आणि बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत २००० कार्यक्रमातून सामाजिक एकता, अंहिसा आणि सर्व धर्म समभावाबाबत प्रबोधन केले.

प्रश्न - आपल्या लेखी आपण कोणाला मोठं मानता?उत्तर - जगात अनेक मोठ-मोठी लोकं होऊन गेलीत. मोठं-मोठे राजे होऊन गेलेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक पराक्रम त्यांनी गाजविले. मात्र, समाजात सामाजिक समतेचा मुलमंत्र देणारे महापुरूष हेच मोठे होत. त्याचप्रमाणे प्रेमाची शिकवण देणारा प्रत्येक माणूस आपणाला प्रिय आहे. ह्यकोई सलाम करे..कोई नमस्कार करे लेकीन बडा वही है. जो इन्सान से प्यार करे!प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपले योगदान काय?उत्तर - विविध जाती-धर्मांच्या महापुरूषांनी एकात्मतेची शिकवण दिली आहे. मनुष्याचे रक्त एकसारखे असल्याने निमार्ता मनुष्यामध्ये कोणताही भेद करीत नाही. माज्या लेखी देखील जाती आणि वर्णभेदाला कोणतेही स्थान नाही. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी गत ४० वर्षांपासून आपला पुढाकार राहीला आहे. या कालावधीत देशात दोन हजाराच्यावर सर्वधर्म समभावाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केले. त्यामुळे राष्ट्रीय कौमी एकतेचा ह्यदूतह्ण आपली शासनाने नियुक्ती केली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत