शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

राष्ट्रीय एकात्मतेप्रती जागृत असणे युवा पिढीची जबाबदारी - सलाउद्दिन शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 18:07 IST

राष्ट्रीय कौमी एकताचे दूत सल्लाउद्दीन शेख यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आजच्या काळातील काही अप्रिय घटनांमुळे सर्व धर्म समभावाची जपणूक करणारे भारतातील बुध्दीजीवी चिंतेत आहे. मात्र, आपसी मतभेद मिटवून समाजात एकात्मतेची ज्योत पेटविण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. जाती, पंथ आणि मतभेद मिटविण्यासाठी भावी युवापिठी सक्षम आहे, असा आपला ठाम विश्वास आहे. राष्ट्रीय कौमी एकताचे दूत सल्लाउद्दीन शेख यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेच्या कायार्ला सुरूवात कशी झाली?उत्तर - आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील काही निवेदकांची हुबेहुब नकल करून कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करायचो. मात्र, काही वडीलधाऱ्यांनी सल्ला दिला की निवेदन करताना दुसºयाची नकल करण्याऐवजी स्वत:ची शैली निर्माण करा. सुरूवातीला वाईट वाटले पण.. वडील धाऱ्यांचा हाच गुरूमंत्र मला कालातंराने सामाजिक एकतेकडे घेऊन गेला.

प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व पटविण्यासाठी कोठे-कोठे गेलात?उत्तर - विविध सामाजिक कार्यक्रमांचे निवेदन, सुत्रसंचालन करताना अनेक ठिकाणी जाण्याचे योग आले. मात्र, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘दूत’ म्हणून दिल्ली, भोपाळ, आग्रा, तेलंगाणा, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई आणि बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत २००० कार्यक्रमातून सामाजिक एकता, अंहिसा आणि सर्व धर्म समभावाबाबत प्रबोधन केले.

प्रश्न - आपल्या लेखी आपण कोणाला मोठं मानता?उत्तर - जगात अनेक मोठ-मोठी लोकं होऊन गेलीत. मोठं-मोठे राजे होऊन गेलेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक पराक्रम त्यांनी गाजविले. मात्र, समाजात सामाजिक समतेचा मुलमंत्र देणारे महापुरूष हेच मोठे होत. त्याचप्रमाणे प्रेमाची शिकवण देणारा प्रत्येक माणूस आपणाला प्रिय आहे. ह्यकोई सलाम करे..कोई नमस्कार करे लेकीन बडा वही है. जो इन्सान से प्यार करे!प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपले योगदान काय?उत्तर - विविध जाती-धर्मांच्या महापुरूषांनी एकात्मतेची शिकवण दिली आहे. मनुष्याचे रक्त एकसारखे असल्याने निमार्ता मनुष्यामध्ये कोणताही भेद करीत नाही. माज्या लेखी देखील जाती आणि वर्णभेदाला कोणतेही स्थान नाही. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी गत ४० वर्षांपासून आपला पुढाकार राहीला आहे. या कालावधीत देशात दोन हजाराच्यावर सर्वधर्म समभावाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केले. त्यामुळे राष्ट्रीय कौमी एकतेचा ह्यदूतह्ण आपली शासनाने नियुक्ती केली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत