शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
2
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
4
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
5
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
6
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
7
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
8
ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
9
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
10
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
11
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
12
विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचे भारताला किती चटके?
13
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
14
छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी
15
छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स पार्कसाठी  संरक्षणमंत्री अनुकूल, दिल्लीत बैठक घेणार
16
मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी
17
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
18
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
20
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!

आवडीच्या क्षेत्राची निवड करणे महत्वाचे - प्रांजली  कंझारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 16:36 IST

माझ्या इथवरच्या प्रवासात हेच महत्वाचे ठरले, असे मत ‘बबन’ चित्रपटातून चर्चेत आलेली नवोदित अभिनेत्री प्रांजली कंझारकर हीने बोलताना व्यक्त केले.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आपल्याला जे आवडते, त्याचीच निवड करणे सर्वात महत्वाचे आहे. बरेचदा आवडीविरूध्द क्षेत्र निवडल्याने आयुष्यात गोंधळ उडतो. त्यामुळे आवडीचे क्षेत्र निवडण्याचे धैर्य आणि त्याला कुटूंबियांचीही तितकीच साथ; यावरच यश अवलंबून असते. माझ्या इथवरच्या प्रवासात हेच महत्वाचे ठरले, असे मत ‘बबन’ चित्रपटातून चर्चेत आलेली नवोदित अभिनेत्री प्रांजली कंझारकर हीने बोलताना व्यक्त केले.

अभिनय या क्षेत्राकडे कश्या वळल्या?लहानपणापासूनच मला नाटकात काम करायची सवय होती. शाळेमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रम हा माझ्या आवडीचा विषय होता. तेव्हापासून टीव्हीवर दिसणाऱ्या नट्या आकर्षित करायच्या. आपणही टीव्हीवर दिसावे, असे सारखे वाटायचे. तोच ध्यास शेवटी सत्यात उतरला.

अभिनय करण्याची संधी केव्हा मिळाली?मुळात मी इंजिनिअरिंग करायला पुण्यात आले. बीई करीत असताना सन २०१६ मध्ये सेंकड इअरमधे होते. त्याचवेळी पुण्यात ‘बबन’ चित्रपटसाठी आॅडिशन सुरू होते. त्यात मी सहभागी झाले, आणि माझी निवड झाली. डिसेंबर २०१६ मध्ये हे आॅडिशन झाले आणि त्यानंतर २४ फेब्रुवारी २०१७ ला पहिल्यांदा प्रत्यक्ष सेटवर अभिनय करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून हा प्रवास सुरूच आहे.

नाटकांच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?ती पहिली रात्र, कुर्यात सदा टिंगलम ही महत्वाची दोन नाटके आहेत. यासह इतरही अनेक छोट्या नाटकांमध्ये मी काम केले. परंतु जेव्हा बबन हा चित्रपट २३ मार्च २०१८ मध्ये दिग्दर्शीत झाला, तेव्हाच खरी माझी ओळख झाली. मुख्य नायिकेच्या मैत्रिणीचा रोल मला मिळाला. मी त्या भुमिकेला पुर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच खºया अर्थाने मला ग्लॅमर प्राप्त झाले. सध्या आणखी दोन नवीन चित्रपटात काम करायचे आहे. फेब्रुवारीमध्ये त्याचे काम सुरू होईल.नवोदित कलाकारांना काय संदेश द्याल?संयम सर्वात महत्वाचा आहे. अभिनय क्षेत्रात सातत्याने स्पर्धा राहते, ती टिकून राहण्याची. काही वर्षांआधी मोठे नाव कमविलेल्या अनेक अभिनेत्री सध्या पडद्यावर दिसत नाहीत. ही अवस्थाच सगळ्यात आव्हानात्मक आहे. त्यामुळे मिळेत त्या परिस्थिती मिळेल ते काम करण्याची तयारी असली, की नैराश्य येत नाही. सध्याही आपण अनेक महान कलावंतांना अगदी छोट्या जाहीरातीत काम करताना पाहतो. मनाची ही तयारीच आपल्याला सदोदित प्रेक्षकांच्या नजरेसमोर ठेवते. त्यामुळेच कोणतीही भुमिका मिळाली तरी त्या भुमिकेला न्याय देण्यासाठी झटण्याची तयारी असली, म्हणजे अपयशाचे तोंड पाहावे लागत नाही.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत