शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष १०,२२५ कोटींच्या घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:21 IST

Buldhana News पाच वर्षांत कालबद्ध पद्धतीने केलेल्या आर्थिक नियोजनानुसार निधी उपलब्ध केल्यास सिंचन तो दूर करण्यास मदत होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष आता १० हजार २२५ कोटी ७९ लाख रुपयांवर पोहोचला असून, येत्या पाच वर्षांत कालबद्ध पद्धतीने केलेल्या आर्थिक नियोजनानुसार निधी उपलब्ध केल्यास सिंचन तो दूर करण्यास मदत होईल. त्यानुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यात घेतलेल्या जलसंपदा विभागाच्या वैठकीनंतर घेतलेल्या निर्णयावर सिंचन अनुशेष निर्मूलनाचे भवितव्य अवलंबून आहे.१३ हजार ८७४ कोटी रुपये किंमत असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आतापर्यंत ४ हजार ९९ कोटी (मार्च २०२० पर्यंत) खर्च करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी आणखी नऊ हजार ७७५ कोटी ५९ लाख रुपयांची गरज आहे. त्यानुषंगाने आगामी पाच वर्षांत सरासरी जिल्ह्यातील निर्माणाधीन व पूर्णत्वास गेलेल्या तथा काही किरकोळ कामे राहिलेल्या प्रकल्पांसाठी सरासरी दोन हजार रुपये उपलब्ध झाल्यास हा सिंचन अनुशेष दूर होण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त बोरखेडी, राहेरी या लघु प्रकल्पासाठी अनुक्रमे २२.७ कोटी आणि ४ कोटी ६५ लाख रुपयांची गरज आहे. या व्यतिरिक्त बळिराजा संजीवनी योजनेंतर्गत आलेवाडी प्रकल्पासाठी १२० कोटी २९ लाख, अरकचेरी प्रकल्पासाठी  २२२ कोटी ८० लाख रुपये आणि चौंढी प्रकल्पासाठी ७८ कोटी ५३ लाख रुपयांची आवश्यकता आहे. आगामी तीन वर्षांमध्ये हा निधी अपेक्षेप्रमाणे उपलब्ध झाल्यास जिल्ह्याचा १० हजार २२५ कोटी ७९ लाख रुपयांचा सिंचन अनुशेष दूर होऊ शकतो. मात्र, त्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने निधी वाटपाच्या सूत्राच्या बाहेर जाऊन मदत करणे गरजेचे झाले आहे. 

जिल्ह्यातील १०८ प्रकल्प पूर्ण जिल्ह्यातील दोन मोठे, सात मध्यम आणि ९९ लघु प्रकल्प पूर्णत्वास गेले असून, बांधकामाधीन प्रकल्पांमध्ये दोन मोठ्या आणि पाच लघु प्रकल्पांचा समावेश आहे. अपेक्षित निधी नियमित स्वरूपात दरवर्षी उपलब्ध झाला तर येत्या पाच वर्षांत सिंचन अनुशेष दूर केला जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी आता राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

६८ हजार हेक्टर प्रत्यक्ष सिंचनजिल्ह्यातील १०८ पूर्ण झालेल्या प्रकल्पांची  निर्मित सिंचन क्षमता ही एक लाख १५६३ हेक्टर असून, त्यापैकी प्रत्यक्षात ६९ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळत आहे. त्याचे क्षेत्र हे ६९ हजार ७०४ हेक्टर एवढे येते. दरम्यान, जिल्ह्यातील महत्तम सिंचन क्षमता ही दोन लाख २३ हजार हेक्टरच्या आसपास आहे. निर्माणाधीन प्रकल्प पूर्ण झाल्यास जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेत आणखी वाढ होऊन जवळपास ९१ हजार ४७१ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प