शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी होणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:06 IST

वरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने  वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या  धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर  अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार आहे. 

ठळक मुद्दे१९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले आहेया प्रकल्पाचे पाणी अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना जाणार 

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने  वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या  धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर  अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार  असून, बुलडाणा जिल्हय़ातील १४0 गाव पाणीपुरवठा योजनें तर्गत  कामे अपूर्ण असल्याने या गावांची पाण्याची प्रतीक्षा कायम  आहे. संग्रामपूर तालुक्यातील वान नदीवर वान प्रकल्प झाल्याने  काठावरील गावांच्या जलपातळीत प्रचंड प्रमाणात घट झाल्याने  सिंचन क्षेत्र घटले व पाणी टंचाईचा सामना करावा लागत  आहे.हनुमान सागर या नावाने ओळखल्या जात असलेल्या वाण  प्रकल्पात बर्‍यापैकी जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अकोट व  तेल्हारा या दोन्ही तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी पाणीपुरवठा  केला जावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीने शासन  दरबारी करून सतत पाठपुरावा केल्याने असल्याने अखेर २६  ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अकोट व तेल्हारा या दोन्ही तालु क्यातील १५९ गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत शासन निर्णय  धडकला. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील जनतेला वाण धरणातून  पाणीपुरवठा केला जाणार आहे. परिणामी या तालुक्यातील १९६ हेक्टर जमीन रब्बी हंगामातील  सिंचनापासून वंचित राहणार आहे. हा पाणीपुरवठा हनुमान सागर  जलाशयातून ३.७५३ दलघमी केला जाणार असून,कालवा क्र .  २६0 द्वारे हे पाणी निगर्मित केले जाणार आहे. तर बुलडाणा  जिल्हय़ातील जळगाव जा, संग्रामपूर तालुक्यातील जनता  क्षारयुक्त पाणी पित असल्याने किडनी आजारात मोठय़ा प्रमाणात  वाढ होत आहे. १४0 गाव योजनेची कामे बाकी असल्याने  अनेक गावांना हक्काच्या वाण धरणातील पाणी अद्याप मिळत  नसल्याचे दिसून येते. बुलडाणा जिल्हय़ातील वान धरणाचे ह क्काचे पाणी अकोला जिल्हय़ात पळविले जात असताना  जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असल्याने ह क्काच्या वाण धरणातील शुद्ध पाण्यापासून वंचित असलेल्या  जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला असून, नाराजीचा सूर निघत  आहे. संग्रामपूर तालुक्यातील १४0 गाव पाणीपुरवठा योजना  मंजूर असून, टाकीचे बांधकाम झाले. पाइपलाइनचे कामही  बर्‍याच प्रमाणात झाले; पण वाण धरणातून पाणी संबंधित गावात  केव्हा पोहचणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागून आहे.

टॅग्स :Waterपाणी