शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी होणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:06 IST

वरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने  वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या  धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर  अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार आहे. 

ठळक मुद्दे१९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले आहेया प्रकल्पाचे पाणी अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना जाणार 

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने  वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या  धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर  अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार  असून, बुलडाणा जिल्हय़ातील १४0 गाव पाणीपुरवठा योजनें तर्गत  कामे अपूर्ण असल्याने या गावांची पाण्याची प्रतीक्षा कायम  आहे. संग्रामपूर तालुक्यातील वान नदीवर वान प्रकल्प झाल्याने  काठावरील गावांच्या जलपातळीत प्रचंड प्रमाणात घट झाल्याने  सिंचन क्षेत्र घटले व पाणी टंचाईचा सामना करावा लागत  आहे.हनुमान सागर या नावाने ओळखल्या जात असलेल्या वाण  प्रकल्पात बर्‍यापैकी जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अकोट व  तेल्हारा या दोन्ही तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी पाणीपुरवठा  केला जावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीने शासन  दरबारी करून सतत पाठपुरावा केल्याने असल्याने अखेर २६  ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अकोट व तेल्हारा या दोन्ही तालु क्यातील १५९ गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत शासन निर्णय  धडकला. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील जनतेला वाण धरणातून  पाणीपुरवठा केला जाणार आहे. परिणामी या तालुक्यातील १९६ हेक्टर जमीन रब्बी हंगामातील  सिंचनापासून वंचित राहणार आहे. हा पाणीपुरवठा हनुमान सागर  जलाशयातून ३.७५३ दलघमी केला जाणार असून,कालवा क्र .  २६0 द्वारे हे पाणी निगर्मित केले जाणार आहे. तर बुलडाणा  जिल्हय़ातील जळगाव जा, संग्रामपूर तालुक्यातील जनता  क्षारयुक्त पाणी पित असल्याने किडनी आजारात मोठय़ा प्रमाणात  वाढ होत आहे. १४0 गाव योजनेची कामे बाकी असल्याने  अनेक गावांना हक्काच्या वाण धरणातील पाणी अद्याप मिळत  नसल्याचे दिसून येते. बुलडाणा जिल्हय़ातील वान धरणाचे ह क्काचे पाणी अकोला जिल्हय़ात पळविले जात असताना  जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असल्याने ह क्काच्या वाण धरणातील शुद्ध पाण्यापासून वंचित असलेल्या  जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला असून, नाराजीचा सूर निघत  आहे. संग्रामपूर तालुक्यातील १४0 गाव पाणीपुरवठा योजना  मंजूर असून, टाकीचे बांधकाम झाले. पाइपलाइनचे कामही  बर्‍याच प्रमाणात झाले; पण वाण धरणातून पाणी संबंधित गावात  केव्हा पोहचणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागून आहे.

टॅग्स :Waterपाणी