शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी होणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:06 IST

वरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने  वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या  धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर  अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार आहे. 

ठळक मुद्दे१९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले आहेया प्रकल्पाचे पाणी अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना जाणार 

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने  वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या  धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर  अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार  असून, बुलडाणा जिल्हय़ातील १४0 गाव पाणीपुरवठा योजनें तर्गत  कामे अपूर्ण असल्याने या गावांची पाण्याची प्रतीक्षा कायम  आहे. संग्रामपूर तालुक्यातील वान नदीवर वान प्रकल्प झाल्याने  काठावरील गावांच्या जलपातळीत प्रचंड प्रमाणात घट झाल्याने  सिंचन क्षेत्र घटले व पाणी टंचाईचा सामना करावा लागत  आहे.हनुमान सागर या नावाने ओळखल्या जात असलेल्या वाण  प्रकल्पात बर्‍यापैकी जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अकोट व  तेल्हारा या दोन्ही तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी पाणीपुरवठा  केला जावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीने शासन  दरबारी करून सतत पाठपुरावा केल्याने असल्याने अखेर २६  ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अकोट व तेल्हारा या दोन्ही तालु क्यातील १५९ गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत शासन निर्णय  धडकला. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील जनतेला वाण धरणातून  पाणीपुरवठा केला जाणार आहे. परिणामी या तालुक्यातील १९६ हेक्टर जमीन रब्बी हंगामातील  सिंचनापासून वंचित राहणार आहे. हा पाणीपुरवठा हनुमान सागर  जलाशयातून ३.७५३ दलघमी केला जाणार असून,कालवा क्र .  २६0 द्वारे हे पाणी निगर्मित केले जाणार आहे. तर बुलडाणा  जिल्हय़ातील जळगाव जा, संग्रामपूर तालुक्यातील जनता  क्षारयुक्त पाणी पित असल्याने किडनी आजारात मोठय़ा प्रमाणात  वाढ होत आहे. १४0 गाव योजनेची कामे बाकी असल्याने  अनेक गावांना हक्काच्या वाण धरणातील पाणी अद्याप मिळत  नसल्याचे दिसून येते. बुलडाणा जिल्हय़ातील वान धरणाचे ह क्काचे पाणी अकोला जिल्हय़ात पळविले जात असताना  जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असल्याने ह क्काच्या वाण धरणातील शुद्ध पाण्यापासून वंचित असलेल्या  जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला असून, नाराजीचा सूर निघत  आहे. संग्रामपूर तालुक्यातील १४0 गाव पाणीपुरवठा योजना  मंजूर असून, टाकीचे बांधकाम झाले. पाइपलाइनचे कामही  बर्‍याच प्रमाणात झाले; पण वाण धरणातून पाणी संबंधित गावात  केव्हा पोहचणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागून आहे.

टॅग्स :Waterपाणी