शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवेळ कर्मचारी भरती प्रक्रियेत अनियमितता

By admin | Updated: December 20, 2014 00:17 IST

कामगार कल्याण मंडळ : सेवाशर्तीचे नियम डावलले.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा राज्यातील कामगार कल्याण मंडळाअंतर्गत अर्धवेळ कर्मचार्‍यांची भरती करताना सेवाशर्तीचे नियम डावलण्यात आले. गेल्या दोन वर्षात भरतीत अनियमिततेमुळे काही मंडळ सदस्यांनी स्वहित साधले. त्यामुळे पूर्णवेळ कर्मचार्‍यांसह २0-२५ वर्षे अर्धवेळ सेवा झालेले कर्मचारी सेवेपासून वंचित राहिले आहेत. कामगार कल्याण मंडळाच्या २५ जुलै २0१३ च्या परिपत्रकानुसार कामगार कल्याण मंडळात अर्धवेळ कर्मचारी भरती करताना विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील केंद्रातील अर्धवेळ कर्मचार्‍यांच्या रिक्त पदासाठी उमेदवार सेवायोजन कार्यालयाकडून मागविण्यात यावे, असे स्पष्ट नमूद केले आहे. मात्र सन २0१३-१४ व २0१४-१५ या आर्थिक वर्षात राज्यातील कामगार कल्याण मंडळात तब्बल १२५ पेक्षा जास्त अर्धवेळ कर्मचार्‍यांनी नियमबाह्य भरती करण्यात आली आहे. यात अकोला, औरंगाबाद विभागाला सर्वाधिक अर्धवेळ कर्मचार्‍यांचा भरणा करण्यात आला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अकोला विभागार्तंगत अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये एकूण ३५ केंद्र विभागीय व गट कार्यालयात जवळपास २५ अर्धवेळ कर्मचार्‍यांची नेमणूक अशासकीय सदस्यांच्या दबावातून केली आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागीय कार्यालयात जवळपास ४0 अर्धवेळ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खर्‍या अर्धवेळ कर्मचार्‍यांवर अन्याय झाला आहे. राज्यात एकूण २३५ कामगार कल्याण केंद्रे असून, ७ विभागामध्ये १९ गट कार्यालये आहेत. राज्यातील कामगार कल्याण मंडळात अडीच हजाराच्यावर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र शासनसेवा निर्धारित नियमांना डावलून जवळपास दीडशेच्यावर कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली आहे.