शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

अर्धवेळ कर्मचारी भरती प्रक्रियेत अनियमितता

By admin | Updated: December 20, 2014 00:17 IST

कामगार कल्याण मंडळ : सेवाशर्तीचे नियम डावलले.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा राज्यातील कामगार कल्याण मंडळाअंतर्गत अर्धवेळ कर्मचार्‍यांची भरती करताना सेवाशर्तीचे नियम डावलण्यात आले. गेल्या दोन वर्षात भरतीत अनियमिततेमुळे काही मंडळ सदस्यांनी स्वहित साधले. त्यामुळे पूर्णवेळ कर्मचार्‍यांसह २0-२५ वर्षे अर्धवेळ सेवा झालेले कर्मचारी सेवेपासून वंचित राहिले आहेत. कामगार कल्याण मंडळाच्या २५ जुलै २0१३ च्या परिपत्रकानुसार कामगार कल्याण मंडळात अर्धवेळ कर्मचारी भरती करताना विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील केंद्रातील अर्धवेळ कर्मचार्‍यांच्या रिक्त पदासाठी उमेदवार सेवायोजन कार्यालयाकडून मागविण्यात यावे, असे स्पष्ट नमूद केले आहे. मात्र सन २0१३-१४ व २0१४-१५ या आर्थिक वर्षात राज्यातील कामगार कल्याण मंडळात तब्बल १२५ पेक्षा जास्त अर्धवेळ कर्मचार्‍यांनी नियमबाह्य भरती करण्यात आली आहे. यात अकोला, औरंगाबाद विभागाला सर्वाधिक अर्धवेळ कर्मचार्‍यांचा भरणा करण्यात आला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अकोला विभागार्तंगत अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये एकूण ३५ केंद्र विभागीय व गट कार्यालयात जवळपास २५ अर्धवेळ कर्मचार्‍यांची नेमणूक अशासकीय सदस्यांच्या दबावातून केली आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागीय कार्यालयात जवळपास ४0 अर्धवेळ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खर्‍या अर्धवेळ कर्मचार्‍यांवर अन्याय झाला आहे. राज्यात एकूण २३५ कामगार कल्याण केंद्रे असून, ७ विभागामध्ये १९ गट कार्यालये आहेत. राज्यातील कामगार कल्याण मंडळात अडीच हजाराच्यावर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र शासनसेवा निर्धारित नियमांना डावलून जवळपास दीडशेच्यावर कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली आहे.