शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:04 IST

संग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या आदिवासीबहूल संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने हा तालुका सध्या आधुनिकीकरणापासून दूर जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या आदिवासीबहूल संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने हा तालुका सध्या आधुनिकीकरणापासून दूर जात आहे. भारत सरकारने सुध्दा डिजीटल इंडियाचा नारा देत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय आॅनलाईन केले. डिजीटल इंडियाचा गाजावाजा करणाºया शासनाचे पितळ यामुळे उघडे पडत आहे.संग्रामपूर येथे बीएसएनएल चे कार्यालय आहे. तालुक्यात दुसरे कार्यालय सोनाळा येथे आहे. मात्र हे दोन्ही कार्यालय कायम बंद अवस्थेत असून केवळ शोभेची वस्तु बनले आहेत. त्यामुळे बीएसएनएलची सेवा वारंवार विस्कळीत होते. एकेकाळी बीएसएनएल लँडलाईन तसेच सिमकार्ड वापरणाºयांची सख्या मोठी होती. मात्र सध्या या कंपनीला नागरीकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. भारत सरकारची टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बीएसएनएल आहे, मात्र नाव मोठे दर्शन खोटे याप्रमाणे या कंपनीची गत झाली आहे. ब्रॉण्डबॅण्ड सेवेत महिन्यातून पंधरा दिवस बिघाड येतो. त्यामुळे तालुक्यात लिंकअभावी शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांचे कामकाज पुर्णपणे ठप्प होते. सध्या कोणत्याही क्षेत्रात साधा अर्ज करावयाचा झाला, तरी आॅनलाईन पध्दतीने करावा लागतो. असे असताना, अनेकवेळा इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने पाच मिनीटांच्या कामाला दिवस-दिवस वाट पाहावी लागते.  ही मोठी शोकांतिका आहे. बीएसएनएल सोबत खाजगी कंपन्यांची सेवाही फारशी चांगली नाही. फोरजी सेवेच्या नावाखाली टु जी ची इंटरनेट स्पीड मोबाईल धारकांना मिळत आहे. नेटवर्कच्या बाबतीत ही खासगी कंपन्याची सेवा सुध्दा ढिसाळ असल्याचे दिसून येत आहे. तासनतास नेटवर्क गायब राहते. कॉलड्रॉप बद्दल ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग डिजीटल इंडिया पासून सध्यातरी दूर आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूर