शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:04 IST

संग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या आदिवासीबहूल संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने हा तालुका सध्या आधुनिकीकरणापासून दूर जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या आदिवासीबहूल संग्रामपूर तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने हा तालुका सध्या आधुनिकीकरणापासून दूर जात आहे. भारत सरकारने सुध्दा डिजीटल इंडियाचा नारा देत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय आॅनलाईन केले. डिजीटल इंडियाचा गाजावाजा करणाºया शासनाचे पितळ यामुळे उघडे पडत आहे.संग्रामपूर येथे बीएसएनएल चे कार्यालय आहे. तालुक्यात दुसरे कार्यालय सोनाळा येथे आहे. मात्र हे दोन्ही कार्यालय कायम बंद अवस्थेत असून केवळ शोभेची वस्तु बनले आहेत. त्यामुळे बीएसएनएलची सेवा वारंवार विस्कळीत होते. एकेकाळी बीएसएनएल लँडलाईन तसेच सिमकार्ड वापरणाºयांची सख्या मोठी होती. मात्र सध्या या कंपनीला नागरीकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. भारत सरकारची टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बीएसएनएल आहे, मात्र नाव मोठे दर्शन खोटे याप्रमाणे या कंपनीची गत झाली आहे. ब्रॉण्डबॅण्ड सेवेत महिन्यातून पंधरा दिवस बिघाड येतो. त्यामुळे तालुक्यात लिंकअभावी शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांचे कामकाज पुर्णपणे ठप्प होते. सध्या कोणत्याही क्षेत्रात साधा अर्ज करावयाचा झाला, तरी आॅनलाईन पध्दतीने करावा लागतो. असे असताना, अनेकवेळा इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने पाच मिनीटांच्या कामाला दिवस-दिवस वाट पाहावी लागते.  ही मोठी शोकांतिका आहे. बीएसएनएल सोबत खाजगी कंपन्यांची सेवाही फारशी चांगली नाही. फोरजी सेवेच्या नावाखाली टु जी ची इंटरनेट स्पीड मोबाईल धारकांना मिळत आहे. नेटवर्कच्या बाबतीत ही खासगी कंपन्याची सेवा सुध्दा ढिसाळ असल्याचे दिसून येत आहे. तासनतास नेटवर्क गायब राहते. कॉलड्रॉप बद्दल ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग डिजीटल इंडिया पासून सध्यातरी दूर आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूर