शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लॉकडाऊन काळात १.३५ लाख नागरिकांचा आंतरजिल्हा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:45 IST

विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने या कालावधीत ४५ हजार ३०९ वाहनांना परवानगी दिली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मिसन अनलॉकच्या दिशने मे महिन्याच्या मध्यावर पावले पडायला लागली असतानाच या कालावधीत जवळपास एक लाख ३५ हजार नागरिकांनी आंतरजिल्हा प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने या कालावधीत ४५ हजार ३०९ वाहनांना परवानगी दिली होती.बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, मोताळा, बुलडाणा, मेहकरसह अन्य तालुक्यातील मुले, नागरिक हे पुणे आणि मुंबई परिसरात शिक्षणासोबतच उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले आहेत किंवा त्या ठिकाणी स्थायीक झालेल आहेत. पुण्या मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाल्याने तेथील आपल्या निकटवर्तीयांना जिल्ह्यात आणण्यासाठीची धावपळ अनेकांनी केली होती. मात्र पुण्या-मुंबईतून बुलडाणा जिल्ह्यात येण्यासाठी भाड्याने वाहने मिळण्याचे प्रमाण अत्यल्प होते. परिणामी बुलडाणा जिल्ह्यातूनच या परजिल्ह्यात वाहने घेवून अनेकांनी त्यांच्या पाल्यांना तथा नातेवाईकांना स्वगृही परत आणले होते. मे महिन्यातच स्थालांतरीत मजुरांचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. याच कालावधीत जिल्ह्यात जवळपास एक लाखांपेक्षा अधिक नागरिक परतले होते. ४५ हजार वाहनांना परवानगी देण्यात आली होती. चार सिटर कारमध्ये वन प्ल्स टू आणि सेव्हन सिटरमध्ये वन प्लस चार या प्रमाणे परवानगी देण्यात आली होती. झिरो पेन्डन्सी ठेवून या परवानग्या देण्यात आल्या होता.दरम्यान, मे महिन्याच्या मध्यावर शिथीलतेच्या दिशेने पावले पडू लागल्यानंतर मिळले त्या साधणाने पश्चिम महाराष्ट्रातून, मुंबईतून नागरिक बुलडाणा जिल्ह्यात स्वगृही परतले होते. जवळपास एक लाख नागरिकांना त्यावेळी होम क्वारंटनी करण्यात आले होते. जळगाव, अकोला, औरंगाबाद येथूनही मोठ्या प्रमाणात नागरिक स्वगृही परतले होते. २६ हजार परवानग्या नाकारल्याया कालावधीत जिल्हा प्रशासनाने तब्बल २६ हजार ११५ परवानग्याही नाकारल्या आहेत. प्रामुख्याने प्रतिबंधीत क्षेत्र असलेल्या भागात जाण्यासाठी तथा लॉकडाऊन काळात वाहनाने प्रवास करताना घालून दिलेल्या नियमांब बगल देत जादा प्रवाशी वाहनाद्वारे आणण्याची मागणी केल्यामुळे या परवानग्या नाकारण्यात आल्या होत्या. एकंदरीत जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात एकट्या बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ७० हजार वाहनांसाठी परवानग्या मागण्यात आल्या होत्या हे आता स्पष्ट होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा