शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

वेळेवर कर्ज भरणार्‍यांवर अन्याय

By admin | Updated: July 5, 2014 23:48 IST

उशीरा कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना लाभ मिळत असल्याने अनेक शेतकर्‍यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.

खामगाव: पीक कर्जाचे गारपीटग्रस्तांना पुनर्गठण करताना वेळेवर भरणा करणार्‍या शेतकर्‍यांवर जिल्हाधिकार्‍यांचे त्या आदेशामुळे अन्याय होत असून उशीरा कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना लाभ मिळत असल्याने अनेक शेतकर्‍यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.शासनाने पीक कर्ज १ लाखापर्यंत बिगरव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पीक कर्ज भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असते. मार्च महिन्यातच शेतकरी कर्ज नवे जुने करुन जुने कर्ज भरुन पुन्हा पीक कर्ज उचलतात. त्याला निल करुन कर्ज उचलणे असे संबोधले जातात. मात्र यावर्षी ज्या भागात गारपीट झाली असेल त्या भागातील शेतकर्‍यांना शासनाचे अनुदान मिळाले असेल अशा शेतकर्‍यांना शासनाने कर्जाचे पुनर्गठण करुन त्यांच्याकडील कोणतीही शेतीची कर्ज वसुली करण्यास ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुनर्गठण म्हणजे मागच्यावर्षी ज्या शेतकर्‍याला १ लाखाचे पीक कर्ज देण्यात आले होते त्या शेतकर्‍यांना यावर्षी पुन्हा मागच्यावर्षीचे १ लाख न भरता पुन्हा १ लाखाचे पीक कर्ज देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ह्या मागच्या १ लाख कर्जाचे २ ते ३ हप्ते भरुन २ ते ३ वर्षात ते भरण्याची मुदत देण्यात आली आहे. यावर्षी शासनाने गारपीटग्रस्तांसाठी सदर पुनर्गठण योजना तालुक्यातील काही गावांसाठी मंजूर केली आहे. खामगाव येथील बँक ऑफ बडोदा या शाखेत सदर योजनेचे अर्ज शासनाच्यावतीने बँकेने स्विकारणे सुरु करुन पुनर्गठण कर्ज वाटप सुरु केले. जिल्हाधिकारी यांनी बँकेला पाठविलेल्या पत्रात ज्या शेतकर्‍यांनी ३0 मार्च २0१३ नंतर कर्ज घेतले आहेत अशांना पुनर्गठण कर्जाचा लाभ द्यावा त्यामुळे ३१ मार्च २0१३ ही वेळेवर भरणा करुन कर्ज काढणार्‍यांची तारीख असतांना त्यानंतर म्हणजे वेळ चुकून कर्ज काढणार्‍या एप्रिलच्या पुढच्या महिन्यात उचल करणार्‍या शेतकर्‍यांना पुनर्गठण व वेळेवर कर्ज भरणा करणार्‍यांना मात्र पुनर्गठणाचा लाभ नाही. त्यामुळे वेळेवर कर्ज भरणारे शेतकरी बांधवांमध्ये शासनाबाबत प्रचंड असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे वेळेवर कर्ज भरणारे जास्त आहेत व वेळ चुकून कर्ज भरणारे कमी आहेत. मात्र जिल्हाधिकारी यांच्या पत्रामुळे नियमित वेळेवर कर्ज भरणार्‍यांना हा पुनर्गठणाचा लाभ होणार नाही. पुनर्गठणात कर्ज एकाचवेळी १00 टक्के देणे आवश्यक आहे. मात्र काही बँका ५0 टक्के एका महिन्यात देणार. एकंदरीत या निर्णयामुळे शासनाच्या विरोधात वेळेवर भरणा करणार्‍या शेतकर्‍यांचा रोष वाढत असून नियमाप्रमाणे २0१३ मध्ये पीक कर्ज घेणार्‍या सर्वांंना गारपीटग्रस्तांना पुर्नगठण योजनेचा लाभ होणे गरजेचे आहे एवढे मात्र खरे!