शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आरटीईच्या प्रक्रियेत सुरूवातीलाच विघ्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:46 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र आरटीई प्रक्रियेच्या सुरूवातीलाच विघ्न निर्माण झाल्याने आता प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र आरटीई प्रक्रियेच्या सुरूवातीलाच विघ्न निर्माण झाल्याने आता प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. शाळांच्या नोंदणीसाठी ८ ते २२ फेब्रुवारी हा कालावधी ठेवण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली असून शाळांच्या नोंदणीकरीता आता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.  समाजातील दुर्बल व वंचीत घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीईची २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सीबीएसई, आयसीएसई व आयबीसह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहेत, अशा प्रकारच्या शाळा या प्रवेशासाठी पात्र आहेत. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील २३० शाळा पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, ८ फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यास सुरूवात झाली आहे. आरटीई प्रवेशपात्र शाळांची नोंदणी करण्यासाठी ८ ते २२ फेब्रुवारी असा कालावधी देण्यात आला होता. तर पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २५ फेब्रुवारी ते ११ मार्च आणि पहिली सोडत काढण्यासाठी १४ ते १५ मार्च असे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र या प्रवेश प्रक्रियेच्या सुरूवातीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीमध्ये आरटीई प्रवेश पात्र शाळांना आॅनलाइन नोंदणी करता न आल्याने आता शाळांच्या नोंदणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत ठेवण्यात आली आहे. परिणामी, पालकांना करावयाचे अर्ज, आॅनलाई सोडत ही सर्व प्रक्रिया पुढे ढकलली आहे. 

अर्जासाठी ५ मार्चचा मुहूर्त !आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशांतर्गत पालकांना अर्ज भरण्यासाठी  २५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया लांबल्याने पालकांच्या अर्जासाठी आता ५ मार्चचा मुहूर्त शिक्षण विभागाला मिळाला आहे. पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत ५ मार्च ते २३ मार्चपर्यंत राहणार आहे. 

 नव्या वेळापत्रकाची प्रतीक्षाआरटईच्या प्रवेश प्रक्रियेची पालकांना सुरूवातीपासून उत्सुकता लागली होती. दरम्यान, ८ फेब्रुवारीला प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन सुरू झाली; मात्र त्यात काही व्यत्यय निर्माण झाल्याने संपुर्ण प्रक्रियेचे वेळापत्रक बदलले आहे. या नव्या वेळापत्रकाची जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागालाही प्रतीक्षा लागली आहे. 

 आरटीईची प्रवेश प्रक्रिया ८ फेब्रुवारीपासून आॅनलाइन सुरू  झाली आहे. आरटीई प्रवेश पात्र शाळांच्या नोंदणीसाठी २२ फेब्रुवारी अंतीम मुदत होती. परंतू काही तांत्रिक अडचणींमुळे यात थोडाफार बदल झालेला आहे. आता २८ फेब्रुवारी ही नोंदणीसाठी अंतीम मुदत आहे. - एस. टी. वºहाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा