शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानाची दाहकता वाढली, गावोगावी पीक मोडण्यावर भर

By विवेक चांदुरकर | Updated: December 14, 2023 15:31 IST

एकलारा बानोदा, काकनवाडा बुद्रुक बावनबीर येथील शेतकऱ्यांनी मोडले पीक

एकलारा बानोदा : अवकाळीचा तडाखा व त्यानंतर कटवर्म किडींचा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो रूपये खर्च करून पेरणी केलेले पीक गावोगाचे शेतकरी मोडत आहेत. शेतकर्यांचा हजारो रूपयांचा खर्च व परिश्रम व्यर`थ जात आहे.

एकालारा बानोदासह संग्रामपुर तालुक्यातील शेतकर्यांना रब्बीतील हरबरा पिकावर रोटाव्हेटर फिरवावा लागत आहे. एकलारा बानोदा येथील नितीन देशमुख, काकनवाडा बुद्रुक येथील अमोल रावणकार, बावनबीर येथील राहुल मनसुटे या शेतकर्यांनी हरभरा पीक मोडले आहे.

आधिच दुष्काळ त्यात दुबार पेरणी करावी लागणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अवकाळी पाऊस व धुके पडल्याने बुरशीजन्य रोग हरबरा पिकावर आला आहे. हरभरा पिक जळत आहे. खरिपात अतिवृष्टी झाली. त्यानंतर पावसाचा खंड पडला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुष्काळात बळीराजा भरडला गेला. त्यातुन सावरत उधार, उसणवारी करत रब्बीतील हरबरा पिकाची पेरणी केली. पिक जोमदार दिसत असतांनाच अवकाळी पाऊस सुरु झाला. या पावसानंतर पिकावर बूरशीजन्य रोगाने हल्ला करत पिक उध्वस्त केले. त्यामुळे हताश शेतकर्यांनी रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला. आता दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांपुढे उभे आहे.मी माझ्या शेतामध्ये हरभरा पिकाची लागवड केली होती. परंतु अवकाळी पाऊस व बुरशीजन्य रोग, अळी यामुळे हरभरा पिके पूर्णतः सुकत आहे. दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.- नितीन देशमुख, शेतकरी, एकलारा बानोदा

काकनवाडा शिवारात माझे शेत असून हरभरा या पिकावर मर रोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे हरभरा पिक सुकत आहे. त्यामुळे हरभरा पिकात रोटावेटर फिरविले आहे. शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे. कृषी विभाग व शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.- अमोल रावणकार, शेतकरी, काकनवाडा बुद्रुकमाझ्या शेतात हरभरा या पिकाची लागवड केली होती. अवकाळी पाऊस व पिकांवर झालेला प्रादुर्भाव अळीचे प्रमाण बुरशीजन्य रोग यांनी थैमान घातले आहे. त्यामुळे हरभरा मोडण्याची वेळ आली असून दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शासनाकडून मदत देण्यात यावी तसेच कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे.- राहुल मनसुटे, शेतकरी, बावनबीर

टॅग्स :Farmerशेतकरीbuldhanaबुलडाणा