शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

विदर्भात भूजल पातळीत वाढ

By admin | Updated: May 20, 2014 00:40 IST

गत वर्षी बरसलेला पाऊस त्याचबरोबर अवकाळी पावसानेही विदर्भातील भूजल पातळीत वाढ केली.

नीलेश शहाकार/बुलडाणा

हिवाळा संपता-संपता विदर्भाला गारपीट व अवकाळी पावसाने झोडपले आणि सर्वत्र गारांचा खच पडला, पिके पाण्यात गेली; मात्र या गारपीट व अवकाळी पावसाने भूजल पातळीत वाढ झाली आहे. विदर्भातील सर्वच भागातील भूजल पातळीत सरासरी एक ते दीड मीटरची वाढ झाली आहे. उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाई जाणवते. दुष्काळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो; पण गत वर्षी बरसलेला पाऊस वैदर्भीयांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसानेही भूजल पातळीत वाढ केली. भूजल पातळीचे निरीक्षण करण्यासाठी सप्टेंबर २0१३ आणि २0१४ च्या जानेवारी, मार्च व एप्रिल महिन्यामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे भूजल पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. गत पाच वर्षाच्या भूजल पातळीशी तुलनाही करण्यात आली. त्यानुसार यावेळी सरासरी एक ते दीड मीटरने भूजल पातळी वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदा काही भागातील अपवाद वगळता विदर्भात पाणीटंचाईचे संकट जाणवले नाही.