शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या तक्रारीत वाढ, निपटाऱ्याचे प्रमाण मात्र कमीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:08 IST

बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ग्राहकांच्या फसवणूकीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालले आहे. गत वर्षभरात बुलडाणा जिल्हयात २३१ ग्राहकांनी तक्रारी दिल्याची नोंद जिल्हा ग्राहक मंचाकडे आहे. तक्रारीचे प्रमाण अधिक असले तरी निपटाºयाचे प्रमाण मात्र कमीच असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील तक्रारदार ग्राहकांनी जिल्हा तक्रार निवारण मंच, बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत. या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. झटपट श्रीमंती मिळविण्यासाठी लहान तुकानदारांपासून ते मोठ्या व्यावसायिकांकडून सामान्य ग्राहकांची फसवणुक आणि लुबाडणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. बुलडाणा जिल्हात वर्षभरात २३१ ग्राहकांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे विविध प्रकारे व्यावसायिकांकडून आणि कंपन्यांकडून लुबाडणुक झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अतिस्वात आला आहे. त्यासाठी तक्रार निवारण मंचात मोफत न्याय देण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. जिल्ह्यातील तक्रारदार ग्राहकांनी जिल्हा तक्रार निवारण मंच, बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत. या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. यामध्ये एमआरपी पेक्षा जास्त किंमतीत वस्तूंची विक्री करणे, वजनात दोष आढळले, बँकेकडून ग्राहक फसवणूकीची तक्रार, आयएसआय मार्क वस्तू भासवून निकृष्ट वस्तूंची विक्री होणे अशा अनेक तक्रारी ग्राहक मंचाकडे दाखल झाल्या आहेत. याचबरोबर ग्राहकांना मिळणाºया सुविधांपासून ग्राहकांना काही हरकती असल्यास ते ग्राहक मंचाकडे तक्रारी करू शकतात. न्यायमंचाकडे येणाºया तक्रारींचे प्रमाणही अलीकडेवाढले आहे. सदर तक्रारींचा निपटारा जिल्हा ग्राहक न्यायालयात केला जातो. देशभरात २४ डिसेंबर हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. आज बुधवारी यानिमित्त येथील बुलडाणा जिल्हा ग्राहक मंच कार्यालयातर्फे विविध कार्यक्रम राबविल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.मनुष्यबळाचा अभावग्राहक तक्रार निवारण मंचात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नसल्याने ग्राहकांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अस्तित्वात आला. या कायद्याचे उल्लंघन करणान्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. यामध्ये खाजगी.सरकारी आणि सहकारी संस्थांचाही समावेश केला आहे. एखाद्या वस्तू किंवा सेवेबाबत ग्राहक समाधानी नसेल, तर तो त्याची तक्रार ग्राहक मंचाकडे नोंदवू शकतो.

ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी त्यांना मिळणाºया असुविधेची अथवा फसवणुकीची तक्रार जिल्हा ग्राहक मंचाकडे करावी. त्यांच्या तक्रारींची दखल घेवून संबंधितांवर योग्य ती कारवाई ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून केली जाईल.- आर.ए.पाटील, लेखाधिकारी, जिल्हा ग्राहक मंच

टॅग्स :khamgaonखामगावconsumerग्राहकbuldhanaबुलडाणा