शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

ग्राहकांच्या तक्रारीत वाढ, निपटाऱ्याचे प्रमाण मात्र कमीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:08 IST

बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ग्राहकांच्या फसवणूकीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालले आहे. गत वर्षभरात बुलडाणा जिल्हयात २३१ ग्राहकांनी तक्रारी दिल्याची नोंद जिल्हा ग्राहक मंचाकडे आहे. तक्रारीचे प्रमाण अधिक असले तरी निपटाºयाचे प्रमाण मात्र कमीच असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील तक्रारदार ग्राहकांनी जिल्हा तक्रार निवारण मंच, बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत. या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. झटपट श्रीमंती मिळविण्यासाठी लहान तुकानदारांपासून ते मोठ्या व्यावसायिकांकडून सामान्य ग्राहकांची फसवणुक आणि लुबाडणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. बुलडाणा जिल्हात वर्षभरात २३१ ग्राहकांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे विविध प्रकारे व्यावसायिकांकडून आणि कंपन्यांकडून लुबाडणुक झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अतिस्वात आला आहे. त्यासाठी तक्रार निवारण मंचात मोफत न्याय देण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. जिल्ह्यातील तक्रारदार ग्राहकांनी जिल्हा तक्रार निवारण मंच, बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत. या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. यामध्ये एमआरपी पेक्षा जास्त किंमतीत वस्तूंची विक्री करणे, वजनात दोष आढळले, बँकेकडून ग्राहक फसवणूकीची तक्रार, आयएसआय मार्क वस्तू भासवून निकृष्ट वस्तूंची विक्री होणे अशा अनेक तक्रारी ग्राहक मंचाकडे दाखल झाल्या आहेत. याचबरोबर ग्राहकांना मिळणाºया सुविधांपासून ग्राहकांना काही हरकती असल्यास ते ग्राहक मंचाकडे तक्रारी करू शकतात. न्यायमंचाकडे येणाºया तक्रारींचे प्रमाणही अलीकडेवाढले आहे. सदर तक्रारींचा निपटारा जिल्हा ग्राहक न्यायालयात केला जातो. देशभरात २४ डिसेंबर हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. आज बुधवारी यानिमित्त येथील बुलडाणा जिल्हा ग्राहक मंच कार्यालयातर्फे विविध कार्यक्रम राबविल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.मनुष्यबळाचा अभावग्राहक तक्रार निवारण मंचात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नसल्याने ग्राहकांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अस्तित्वात आला. या कायद्याचे उल्लंघन करणान्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. यामध्ये खाजगी.सरकारी आणि सहकारी संस्थांचाही समावेश केला आहे. एखाद्या वस्तू किंवा सेवेबाबत ग्राहक समाधानी नसेल, तर तो त्याची तक्रार ग्राहक मंचाकडे नोंदवू शकतो.

ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी त्यांना मिळणाºया असुविधेची अथवा फसवणुकीची तक्रार जिल्हा ग्राहक मंचाकडे करावी. त्यांच्या तक्रारींची दखल घेवून संबंधितांवर योग्य ती कारवाई ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून केली जाईल.- आर.ए.पाटील, लेखाधिकारी, जिल्हा ग्राहक मंच

टॅग्स :khamgaonखामगावconsumerग्राहकbuldhanaबुलडाणा