शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

By admin | Updated: May 15, 2014 00:39 IST

साखरखेर्डा परिसरात बुधवारी दुपारच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली

साखरखेर्डा : मृगनक्षत्र सुरु व्हायला जेमतेम तीन आठवड्याचा वेळ असतांना साखरखेर्डा परिसरात बुधवारी दुपारच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी बांधवांपुढे पुन्हा एकदा आसमानी संकट उभे ठाकले आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळ आला आहे. शेतकरी बांधव शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. गत तीन महिन्यात परिसराला अनेकदा अवकाळी पावसाने आणि वादळी वार्‍यासह गारपीटीने झोडपले. त्यामुळे रब्बीच्या पिकांसहीत फळबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यामधील नुकसानग्रस्तांना अद्याप आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे. आसमानी संकटामधून सावरायलाही त्यांना वेळ मिळत नाही. त्यातच पुन्हा एकदा वादळीवार्‍यासह विजेचा कडकडाटासह तासभर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे परिसरातील मोठमोठी वृक्षही उन्मळून पडली होती. साखरखेर्डा-शेंदुर्जन मार्गावर तर पाच ते सहा मोठमोठी वृक्ष वादळी वार्‍याने पडली होती. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली होती. युद्ध पातळीवर मोठमोठी झाडे हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोषराव मोरे करीत होते. तसेच विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता. अचानक आलेल्या या वादळीवार्‍यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. यंदा उन्हाचा पारा क्वचित ४0-४१ डिग्री सेल्सीअस पर्यंत पोहचला. त्यामुळे कडाक्याचा उन्हाळा जाणवला नाही. ८-१५ दिवसांपासून येणारे आभाळ आणि अवकाळी पाऊस त्यामुळे यंदा पावसाळा कसा असेल, पाऊस केव्हा सुरु होईल? असे अनेक प्रश्न बळीराजाची चिंता वाढवित आहे. या बदलत्या हवामानामुळे खरीप पिकाचे नियोजन कसे करावे, कोणते पीक घ्यावे, याबाबत शेतकरीबांधव संभ्रमावस्थेत आहे.