शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

जागतिक तृणधान्य वर्षातच ‘मिलेट मिशन’ला शेतकऱ्यांचा खो

By विवेक चांदुरकर | Updated: November 21, 2023 18:11 IST

तृणधान्याच्या पेरणीकडे फिरविली पाठ,हरभऱ्याला प्राधान्य.

खामगाव : २०२३ - २४ हे पोष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या वर्षात तृणधान्याची पेरणी वाढावी याकरिता कृषी विभागाच्या वतीने ‘मिलेट मिशन’ राबभियान राबविले. मात्र, पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने जमिनीत ओल नसल्याने शेतकर्यांनी गळीत व तृणधान्य पेरणीकडे पाठ फिरविली आहे. हरभर्याची पेरणी मात्र वाढली आहे.

यावर्षी जागतिक तृण धान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे. तृणधान्याचा पेरा कमी झाला आहे. तो वाढविण्याकरिता या वर्षात कृषी विभागाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात आले. मिलेट मिशन अंतर्गत शाळा शाळांमध्ये जावून विद्याथींनी तृणधान्याचे महत्व सांगण्यात आले. मिलेट दौंडचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विजयी स्पर्धकांना तृणधान्याच्या किटच बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या. तृणधान्याच्या पाककला स्पर्धाही घेण्यात आल्या. शेतकर्यांना मिनी किटचेही वाटप करण्यात आले. तसेच शिबीरे घेवून शेतकर्यांना तृण धान्याची लागवड करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने खामगाव, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद तालुक्यातील शेतकर्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला खो दिला. तृणधान्याच्या पेरणीकडे पाठ फिरवित हरभर्याच्या पेरणीला प्राधान्य दिले आहे. खामगाव तालुक्यात रब्बी ज्वारीची ८.०९ टक्के, बागायती गव्हाची ५.५५ टक्के, मक्याची ५.४१ टक्के अशी तृणधान्याची केवळ ५.५६ टक्केच पेरणी झाली आहे. तसेच मलकापूर तालुक्यात रब्बी ज्वारी २२.२२ टक्के, बागायत गहू ३.९१ टक्के, मका ३.४९ टक्के अशी तृणधान्याची केवळ ३.९० टक्के पेरणी झाली आहे. मोताळा तालुक्यात तृणधान्याची ९.८३ टक्के, जळगाव जामोद तालुक्यात १२.२८ टक्केच पेरणी झाली आहे.

अल्प पावसाने पेरणी प्रभावित

यावर्षी पावसाळ्यात कमी पाऊस झाला. पाऊस उशीरा झाल्याने उडिद व मुगाची पेरणी अल्प प्रमाणात करण्यात आली. तसेच पावसाचा दोन ते तीन वेळा १५ दिवसांपेक्षा जास्त खंडही पडला. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबिन, कपाशीचे पीक प्रभावित झाले. सध्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कपाशीचे नुकसान होत आहे. पावसाचा लहरीपणा व किडींच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट आल्याने शेतकर्यांना रब्बी हंगामातील पिकांपासून अपेक्षा होती. मात्र, पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने जमिनीत ओल नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीही प्रभावित झाली आहे. 

जिल्ह्यात ५३ टक्के पेरणी;पिकाचे नाव पेरणी हेक्टर टक्केवारी

रब्बी ज्वारी ६४२३.६० ५०.३४बागायत गहू १३७५२.०० २४.८२मका २७११ २३.०२हरभरा ९८०७८.७० ६६.९७करडइ ७००.३० ६७३.४९जवस ०० ००तीळ ०० ००सुर्यफूल २४.५० ५४.६९एकूण १२१९४१.९० ५३.६७

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी