शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी, जिल्ह्याचा निकाल ९०़ ४५ टक्के; नियमित विद्यार्थ्यांचा ९१़ ७८ टक्के निकाल

By संदीप वानखेडे | Updated: May 21, 2024 16:07 IST

चिखली तालुका जिल्ह्यात प्रथम

बुलढाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल २१ मे राेजी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, निकाल ९०़ ४५ टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१़ ७८ टक्के लागला आहे. जिल्ह्यात चिखली तालुका प्रथम आला आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी यावर्षी काॅपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली हाेती. तसेच ऑन कॅमेरा परीक्षा घेतल्यानंतरही निकालाची टक्केवारी कायम राहिली आहे. जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी ३३ हजार १७७ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. यामध्ये १८ हजार २८२ मुले आणि १४ हजार ८९५ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३२ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्यातील ३० हजार २६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६ हजार ३७७ मुले आणि १३ हजार ८८३ मुलींचा समावेश आहे. मुलांची उत्तीर्ण हाेण्याची टक्केवारी ९०़ ०३ टक्के तर मुलींची ९३.९३ टक्के आहे. नियमित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ९१़ ७८ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल

इयत्ता बारावीच्या विविध शाखांपैकी विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९७़ ७९ टक्के निकाल लागला आहे़ विज्ञान शाखेच्या १९ हजार ५८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी १९ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये १० हजार ८९८ मुले तर ८ हजार २५२ मुलींचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर वाणिज्य शाखेचा ९०़१३ टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचे २ हजार २७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा ८१़ २९ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेच्या १० हजार २८३ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी १० हजार १५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तसेच ८ हजार २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्हाेकेशनल शाखेचा निकाल ८२़०५ टक्के लागला आहे.