शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

देऊळगाव राजात कडक निर्बंधांची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:34 IST

देऊळगाव राजा : काेराेना संक्रमण वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने १० मेच्या रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ...

देऊळगाव राजा : काेराेना संक्रमण वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने १० मेच्या रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. देऊळगाव राजा शहर आणि तालुक्यात या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच सायंकाळी ५ वाजेपर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्ह्यात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांनी १० मेच्या रात्री आठ वाजेपासून कडक निर्बंध लावले आहेत. त्यानुसार महसूल, पोलीस तसेच नगरपालिकेच्या पथकाकडून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरुवात करण्यात आली. मंगळवारी सकाळी दवाखान्याच्या नावाखाली बाहेर पडणाऱ्या नागरिकांना समज देऊन परत पाठवले. यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचा माेठ्या प्रमाणात समावेश हाेता. काही तरुण विनाकारण दुचाकीने फिरताना आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही दुकानदार अर्धे शटर उघडून साहित्य विकताना आढळले. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. ११ मेच्या पाच वाजेपर्यंत तीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. बुलडाणा - जालना सीमेवर आज आरोग्य विभागामार्फत कोरोना संसर्गासंदर्भात रॅपिड टेस्टसुद्धा करण्यात आल्या. परंतु यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नसल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच सीमेवर वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये काही कारण नसताना जिल्ह्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवण्यात आले. यावेळी पोलीस पथकप्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाखेंसह आर. जी. दांडगे, संजय चवरे इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले हाेते. महसूलच्या पथकामध्ये सारिका भगत यांच्या नेतृत्त्वात एस. राणे. नायब तहसीलदार आर. एन. तागवाले, तलाठी एम. के. झिने कर्मचारी उपस्थित होते. नगरपालिका पथकामध्ये पथक प्रमुख सी. पी. तायडे, राजेंद्र गोरे, राजेश अग्रवाल, मनोज अग्रवाल इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून दंडात्मक कारवाईला सामोरे जाऊ नये. बँक सध्या बंद असल्यामुळे घरातूनच ऑनलाईन व्यवहार करावा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. दवाखान्याच्या नावाखाली नागरिकांनी बाहेर पडू नये. ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा शहराकडे येणे टाळावे.

-प्रमोद भातनाखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देऊळगाव राजा