शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रोहयो विहिरींच्या कामात गैरप्रकार; आणखी चार शेतक-यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:49 IST

मोताळा(बुलडाणा) : तालुक्यातील आडविहीर येथे रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आडविहीर येथील दोन शेतकºयांनी ६ एप्रिलपासून शेतात उपोषण सुरू केले होते. दरम्यान, उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी आणखी चार शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत. त्यामुळे उपोषणाची व्याप्ती वाढली आहे. शेतकºयांनी चक्क शेतातील विहिरीसमोरच हे उपोषण सुरू केलेले आहे.

ठळक मुद्दे काम अर्धवट अवस्थेत

मोताळा(बुलडाणा) : तालुक्यातील आडविहीर येथे रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आडविहीर येथील दोन शेतक-यांनी ६ एप्रिलपासून शेतात उपोषण सुरू केले होते. दरम्यान, उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी आणखी चार शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत. त्यामुळे उपोषणाची व्याप्ती वाढली आहे. शेतकºयांनी चक्क शेतातील विहिरीसमोरच हे उपोषण सुरू केलेले आहे.      आडविहीर येथील शेतकरी राजेंद्र भागवत पाटील यांच्या शेतात रोहयो अंतर्गत विहिरीचे काम सुरू होते. संबंधित अधिका-यांनी गैरकारभार करून संपूर्ण कामाची देयके काढली; मात्र काम पूर्ण केले नाही. कागदोपत्री विहीर पूर्ण दाखवून देयके काढण्यात आल्याचा आरोप शेतकºयांनी केला.  कमलबाई बारसू नारखेडे यांच्या शेततळ््याबाबतीतही असाच प्रकार घडला आहे. ५० फूट कामाच्या विहिरीचे फक्त २५ खोदकाम करून काम अर्धवट अवस्थेत आहे. रोहयोच्या कामात असाच भ्रष्टाचार सुरू असल्याचे समजते. राजेंद्र भागवत पाटील व नीलेश बारसू नारखेडे या दोघा शेतकºयांचा उपोषणाचा मंगळवारी पाचवा दिवस होता. दरम्यान, अनेक मान्यवरांनी उपोषणाला भेटी दिल्या; मात्र प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने उपोषण सुरूच आहे. मंगळवारी माजी सभापती शरदचंद्र पाटील, माजी सरपंच श्रीकृष्ण नारखेडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन खाचणे, मनोहर  नारखेडे यांनी सदर उपोषणाला पाठिंबा जाहीर करून उपोषणात सहभागी झाले. त्यामुळे आता एकूण सहा जण उपोषण करीत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा