शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

जिल्ह्यातून लाकडाची अवैध वाहतूक!

By admin | Updated: April 13, 2017 01:04 IST

बुलडाणा जिल्ह्यातील वनक्षेत्रात वृक्षतोड वाढली : वृक्षाची कत्तल करून परजिल्ह्यात

उद्धव फंगाळ - मेहकर बुलडाणा जिल्ह्यातील वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. मेहकर व लोणार तालुक्यातील वन क्षेत्रामध्ये अडजात वृक्षाच्या कत्तलीनंतर सदर लाकडाची वाहतूक परजिल्ह्यात होत आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात व तामिळनाडू या राज्यातही येथील लाकडांची विक्री होत आहे. शासन दरवर्षी वृक्ष लागवड करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. यावर शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्यासाठी विविध मार्गाने जनजागृती करण्यात येते. मात्र, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा शासनाचा उपक्रम बुलडाणा जिल्ह्यात केवळ कागदोपत्रीच सुरु असल्याने शासनाचे लाखो रुपये वाया जात आहेत. मेहकर व लोणार तालुक्यातील वन परिक्षेत्रात व इतर ठिकाणावरुन विविध जातीच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करुन इतर जिल्ह्यासह परराज्यातही मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. संबंधित वृक्षतोड ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने जंगलाचा ऱ्हास होत आहे. बुलडाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या घाटबोरी वन परिक्षेत्र तसेच लोणार तालुक्यातील धाड वन परिक्षेत्रात वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे. या भागात सागवनसह बाभूळ, निंब ही झाडेही मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातून सागवान, निंब, बाभूळ ही झाडे तोडून त्याची बुलडाणा जिल्ह्याबाहेर तसेच परराज्यात विक्रीसाठी नेल्या जात आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात व तामिळनाडू या राज्यात येथील लाकडांची विक्री होत आहे. १ ते २ झाड तोडण्याचा परवाना काढून त्या परवान्याच्या आधारे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन जादा झाडे तोडण्यात येत आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या उपक्रमाचा बोजवारा उडाला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे व अर्थपूर्ण व्यवहारामुळे वृक्ष तोडीचा हा व्यवसाय सुरू असून, यामुळे जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने व्यवसाय सुरु असल्याने तक्रारी करुनही त्याचा काही उपयोग होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.‘त्या’ साडेआठ हजार वृक्षांचे काय झाले?शासनाने मागील वर्षी मोठा गाजावाजा करुन बुलडाणा जिल्ह्यात १ जुलै २०१६ रोजी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. मेहकर तालुक्यासाठी जवळपास साडेआठ हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यावेळी मेहकर तालुक्यात सर्व शासकीय यंत्रणेने वृक्ष लागवड केली होती. परंतु लावलेल्या वृक्षांपैकी किती वृक्षांचे त्या-त्या शासकीय यंत्रणेने संगोपन करुन वृक्ष जिवंत ठेवले, हे पाहणे तितकेच गरजेचे आहे. गतवर्षी वृक्षलागवड झालेल्या ठिकाणी सध्या केवळ ट्रीगार्ड उरले आहेत. आरामशीनची चौकशी करावी!मेहकर व लोणार तालुक्यात असलेल्या आरामशीनवर ठिकठिकाणी सध्या लाकडाचे ढीग पडलेले आहेत. ही लाकडे नेमकी आली कोठून, त्यकडाचा परवाना होता का? तसेच किती लाकडे व कोणत्या जातीची लाकडे तोडण्याचा परवाना होता, याची वरिष्ठांकडून चौकशी करुन संबंधितांकडून कारवाईची मागणी होत आहे.वृक्षतोडीला आळा घालून वृक्षलागवडीसाठी प्रशासनाकडून सदैव प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी अवैध वृक्षतोड करताना कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.-पी.सी. निर्मल, लागवड अधिकारी, मेहकर.