शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

अवैध वाहतूक मजुरांच्या जीवावर बेतली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:37 IST

अपघात झाला. त्यात तेरा जणांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरले गेलेल्या टिप्पर चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर विविध ...

अपघात झाला. त्यात तेरा जणांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरले गेलेल्या टिप्पर चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे. असे असले तरीही अपघाताची खरी जबाबदारी कोणावर हा प्रश्न आहे. मजुरांची अशाप्रकारे अवैध वाहतूक का करण्यात आली? मजुरांना ने-आण करण्यासाठी असलेल्या नियमांचा आणि त्यातील व्यवस्थांचा उपयोग का करण्यात आला नाही असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

याच संदर्भात शासनाच्या बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांकडून काही मुद्दे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रश्नांतून संपूर्ण घटनेला नेमके कोण जबाबदार आहे याचा उलगडा होण्याची अवश्यकता आहे.

--अपघातासंदर्भात पडलेले काही प्रश्न--

-अपघात झालेला रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याच्या बाजूचे शोल्डर व्यवस्थित असावेत असा नियम आहे, मग तढेगावं रस्त्यावर असे शोल्डर होते का?

-मजुरांची वाहतूक करण्यासाठी बैठक व्यवस्था असलेले वाहन असावे लागते असा नियम असताना मजुरांची वाहतूक मालवाहक वाहनातून का केली गेली?

- मजुरांना कामावर घेण्यापूर्वी त्यांचा विमा उतरविला होता का?

-मजुरांना सेप्टी जॅकेट, सेफ्टी शूज, कॅप असावी लागते, ते या मजुरांना का दिले गेले नाहीत?

-मजुरांना राहण्याची आणि खान पानाची व्यवस्था स्वतंत्र असावी. तढेगाव कॅम्पवर ही व्यवस्था होती का?

- कामगार अधिकाऱ्यांनी या व्यवस्था असल्याची खात्री करून घेतली होती का?

असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. या संपूर्ण व्यवस्था नियमाने असाव्या लागतात तर मग इथे या व्यवस्थांची वानवा का होती. व्यवस्था असत्या तर मजुरांचा अशा विचित्र अपघातात हकनाक बळी गेला नसता. त्यामुळे वाहन चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावरच जबाबदारी निश्चित करून या घटनेतून कोणाला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे का? अशी चर्चा या परिसरात आहे. परिणामी घटनेची सखोल चौकशी करून दोषी असलेल्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. याची शासन, प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे.