शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खडकपूर्णातून अडीच दलघमी पाण्याची अवैध उचल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 17:15 IST

खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याची चोरी होत असल्याची ओरड असून, २६ दलघमी मृतसाठ्यापैकी अडीच दलघमी पाण्याची चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दीड दशकातील तीव्र अशा दुष्काळाचा सामना करणार्या बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यतील संत चोखा सागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याची चोरी होत असल्याची ओरड असून, २६ दलघमी मृतसाठ्यापैकी अडीच दलघमी पाण्याची चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान, पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील प्रकल्पामधील जलसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवल्याच्या पृष्ठभूमीवर मध्यंतरी जिल्हयात पाण्याच्या चोरी प्रकरणी आठ प्रकरणात कारवाई केली असून सहा प्रकरणात थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले आहे. या संपूर्ण कारवाई दरम्यान कृषीपंपाचे २५० स्टार्टर्स व मोठ्या प्रमाणावर केबल जप्त केली असल्याचे पाटबंधारे विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे. आॅक्टोबर २०१८ अखेरच जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता शहरी तथा ग्रामीण भागातील योजनांच्या पाणीपुरवठ्यासाठी ३६.४ दलघमी पाणी आरक्षीत करण्यात आले होते. सोबतच पाण्याची चोरी होत असल्यास संबंधितांवर प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी त्यावेळी परिस्थितीचे गांभिर्य पाहता दिले होते. त्या पृष्ठभूमीवर पाटबंधारे विभाग, महसूल विभाग व महावितरणचे कर्मचारी सतर्क होऊन त्यांनी प्रकल्पांच्या परिसरातील बॅकवॉटरमधून पाण्याची चोरी करणार्यांविरोधात कारवाईचा सपाटा लावला होता.यामध्ये लोणार तालुक्यातील बोरखेडी प्रकल्पावर एक, खडकपूर्णा प्रकल्पातंर्गत एक, मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्प व चिखली तालुक्यातील पेनटाकाळी प्रकल्पावरून अवैधरित्या पाण्याची उचल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी दोन तथा ब्राम्हणवाडा प्रकल्पावर एक अशा जवळपास आठ प्रकरणात कारवाई केली होती. सोबतच केबल वायर, २५० स्टार्टस आणि मोटार जप्त केल्या होत्या. मधल्या काळात ही कारवाई थंडावली होती. मात्र आता यंत्रणा पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. परिणामी कोराडी, पेनटाकळीवरीलहा प्रकार बंद झाल्याचे सुत्रांनी सांगितले.खडकपूर्णावर अद्यापही १०० पंपविदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमधून जालना जिल्ह्यात अद्यापही जवळपास १०० पेक्षा अधिक पंपाद्वारे पाण्याची अवैधरित्या उचल केल्या जात असल्याची ओरड आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी जालना जिल्हा प्रशासनास कल्पना दिल्यानंतरही प्रकरणी कारवाई होत नसल्याचे पाटबंधारे विभागातील सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून मृत जलसाठ्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात अवघा ८.९५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पाची मृतसाठ्याची क्षमता ही जवळपास ६० दलघमी आहे. यावरून पाणीप्रश्नाच्या बिकटतेची कल्पना यावी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर