शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

खडकपूर्णातून अडीच दलघमी पाण्याची अवैध उचल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 17:15 IST

खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याची चोरी होत असल्याची ओरड असून, २६ दलघमी मृतसाठ्यापैकी अडीच दलघमी पाण्याची चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दीड दशकातील तीव्र अशा दुष्काळाचा सामना करणार्या बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यतील संत चोखा सागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याची चोरी होत असल्याची ओरड असून, २६ दलघमी मृतसाठ्यापैकी अडीच दलघमी पाण्याची चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान, पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील प्रकल्पामधील जलसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवल्याच्या पृष्ठभूमीवर मध्यंतरी जिल्हयात पाण्याच्या चोरी प्रकरणी आठ प्रकरणात कारवाई केली असून सहा प्रकरणात थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले आहे. या संपूर्ण कारवाई दरम्यान कृषीपंपाचे २५० स्टार्टर्स व मोठ्या प्रमाणावर केबल जप्त केली असल्याचे पाटबंधारे विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे. आॅक्टोबर २०१८ अखेरच जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता शहरी तथा ग्रामीण भागातील योजनांच्या पाणीपुरवठ्यासाठी ३६.४ दलघमी पाणी आरक्षीत करण्यात आले होते. सोबतच पाण्याची चोरी होत असल्यास संबंधितांवर प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी त्यावेळी परिस्थितीचे गांभिर्य पाहता दिले होते. त्या पृष्ठभूमीवर पाटबंधारे विभाग, महसूल विभाग व महावितरणचे कर्मचारी सतर्क होऊन त्यांनी प्रकल्पांच्या परिसरातील बॅकवॉटरमधून पाण्याची चोरी करणार्यांविरोधात कारवाईचा सपाटा लावला होता.यामध्ये लोणार तालुक्यातील बोरखेडी प्रकल्पावर एक, खडकपूर्णा प्रकल्पातंर्गत एक, मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्प व चिखली तालुक्यातील पेनटाकाळी प्रकल्पावरून अवैधरित्या पाण्याची उचल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी दोन तथा ब्राम्हणवाडा प्रकल्पावर एक अशा जवळपास आठ प्रकरणात कारवाई केली होती. सोबतच केबल वायर, २५० स्टार्टस आणि मोटार जप्त केल्या होत्या. मधल्या काळात ही कारवाई थंडावली होती. मात्र आता यंत्रणा पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. परिणामी कोराडी, पेनटाकळीवरीलहा प्रकार बंद झाल्याचे सुत्रांनी सांगितले.खडकपूर्णावर अद्यापही १०० पंपविदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमधून जालना जिल्ह्यात अद्यापही जवळपास १०० पेक्षा अधिक पंपाद्वारे पाण्याची अवैधरित्या उचल केल्या जात असल्याची ओरड आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी जालना जिल्हा प्रशासनास कल्पना दिल्यानंतरही प्रकरणी कारवाई होत नसल्याचे पाटबंधारे विभागातील सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून मृत जलसाठ्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात अवघा ८.९५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पाची मृतसाठ्याची क्षमता ही जवळपास ६० दलघमी आहे. यावरून पाणीप्रश्नाच्या बिकटतेची कल्पना यावी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर