शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अहंकार बाळगला, तर दिल्लीसारखी गत होते - रोहित पवार यांचा भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 18:55 IST

अहंकारावर नम्रता, लोकहिताचे निर्णय, लोकसंवादाचा विजय होतो हे आपण नुकतच पाहल आहे, असा खरमरीत टोला आ. रोहीत पवार यांनी बुलडाणा येथे केंद्रातील भाजप सरकारला नाव न घेता लगावला.

- नीलेश जोशी

बुलडाणा: नाटक करणारे राजकारणात जास्त दिवस टिकत नाही. नाटक आपल्याला जमतही नाही. आपण कितीही मोठ झालो तरी अहंकार येऊ देऊ नका. तो आला तर दिल्ली सारखं होत आणि अहंकारावर नम्रता, लोकहिताचे निर्णय, लोकसंवादाचा विजय होतो हे आपण नुकतच पाहल आहे, असा खरमरीत टोला आ. रोहीत पवार यांनी बुलडाणा येथे केंद्रातील भाजप सरकारला नाव न घेता लगावला. निमित्त होते राजर्षी शाहू फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आयोजित केलेल्या ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे. जवळपास अडीच तास बुलडाणा जिल्ह्यातील युवक, युवतींच्या मनात सलत असणाºया आणि भविष्याचा वेध घेणाºया प्रश्नांना आ. रोहीत पवार यांनी तितक्याच दिलखुलासपणे उत्तरे दिली. शेवटी आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी महाराष्ट्र व देशातील परिस्थितीचा अंदाज घेणारे वक्तव्य करत राजकीय कोपरखळ््यांनी राजकीय परिपक्वतेची चुणूकच दाखवली. ‘अहंकार’ मुद्दा केंद्रस्थानी ठेवत वैयक्तीक जीवनातही तो नको. तसे झाल्यास १०० मार्कच्या पेपरमध्ये ११० टक्के मार्क मिळणार असे म्हंटल्या जाते आणि मग ते ‘२२० च्या आकडे सारखे होऊन जाते. मग अपेक्षीत न मिळता १०० वरच थांबाव लागत!’ अस म्हणत भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावताच कार्यक्रमात सर्वत्र हशा पिकला. सध्याच सरकार हे ‘आपल सरकार आहे.’ युवा वर्गाला या सरकारकडून अपेक्षा आहे आणि सरकारनेही त्या पूर्ण केल्या पाहिजेत.  ‘हे सरकार आपल आहे. ते पुन्हा येईल, पुन्हा येईल अस त्यांच्या सरकार सारख नाही’ अशी मिश्लीक टोलेबाजीही आ. रोहीत पवार यांनी केली.

बजेटमध्ये अनेक सकारात्मक निर्णय

आगामी काळातील राज्याच्या अर्थसंकल्पामध्येही अनेक लोकल्याणकारी सकारात्मक निर्णय अपेक्षीत आहेत. त्यातील काही निर्णय आपल्या अपेक्षेपेक्षाही वेगळे राहतील तर काही आपल्याला न रुचनारेही राहतील. मात्र या ‘आपले सरकार’ने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. नुसतेच निर्णय घेऊन हे सरकार थांबलेले नाही तर त्याच्यावर कामही सुरू आहे. अर्थसंकल्पातही त्याचा प्रत्यय येईल. काही निर्णय अपेक्षेपेक्षा वेगळे मात्र सरस राहतील असे ही ते म्हणाले. दरम्यान भविष्य आपल आहे. कष्ट करावे लागतील. शिक्षण पद्धतीत बदल गरजेचा आहे. तो १०० टक्के होईल, हे सरकार ते करेल, अशी अशाही त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारbuldhanaबुलडाणा