शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

गाव समृद्ध झाले तर लोकांना विस्थापित होण्याची गरज पडणार नाही - सत्यजित भटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:33 IST

Satyajit Bhatkal News 'पाणी फाउंडेशन'चे सीईओ तथा  अभिनेता आमीर खानचे वर्गमित्र सत्यजित भटकळ यांच्याशी साधलेला संवाद.

- नवीन मोदे

 मोताळा : 'पाणी फाउंडेशन'चे सीईओ तथा सत्यमेव जयते या टीव्ही मालीकेचे दिग्दर्शक, अभिनेता आमीर खानचे वर्गमित्र, अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले सत्यजित भटकळ हे नुकतेच मोताळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.  त्यावेळी त्यांच्याशी साधलेला हा संवाद  सत्यमेव जयते ते वॉटर फाउंडेशन हा प्रवास कसा झाला ?सत्यमेव जयते हा कार्यक्रम सामाजिक प्रश्न वर आधारित होता. त्या वेळी देशातील विविध भागातील समस्या तसेच त्यासाठी अहोरात्र काम करणारे अनेक लोक भेटली. हि लोक त्या त्या ठिकाणी काम करत होती. त्यावेळी एखादा प्रश्न लावून धरून त्याचे जनआंदोलनात रूपांतर करून ती समस्या सोडवण्याचा आमिर खान यांनी विचार मांडला व त्यातूनच पाणी फाउंडेशन ची पुढची वाटचाल सुरु झाली.

 पाणी फाउंडेशन च्या आजपर्यंतची वाटचाल किती यशस्वी झाली असे तुम्हाला वाटते? लोक एकत्रित येऊन काम करू शकतात हे यातून सिद्ध झाले ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप मोठा लढा बाकी आहे. जनआंदोलनातून गावे समृद्ध होऊ शकतात हा आत्मविश्वास मिळाला. 

समृद्ध गाव स्पर्धेचे नेमकी संकल्पना काय आहे ?

जलव्यवस्थापन जल व मृदसंधारण, गावकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे ,जंगल निर्मिती ,मातीचे आरोग्य सुधारणे व गवताचे संरक्षित कुरान निर्माण करणे या प्रश्नावर काम केल्याशिवाय गावात समृद्धी येणार नाही, नेमके यावरच समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम होणार आहे .

जलयुक्त शिवार योजना बंद करण्यात आली आहे त्याचा काही परिणाम  होणार आहे का ?

जलयुक्त शिवार योजना अतिशय चांगली योजना होती जलसंधारणासाठी ती उपयोगी पडली. परंतु आजही अनेक योजना आहेत. त्यातूनही अनेक चांगली कामे होऊ शकतात यात शंका नाही.

 पाणी फाउंडेशन च्या कामाला सर्वांचे सहकार्य मिळाले का?

 नक्कीच सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी सहकार्य केले. अनेकांचे पाठबळ मिळाले शासन-प्रशासन खंबीरपणे पाठीशी उभी राहिले. शेवटी हे जन आंदोलन आहे .

पाणी फाउंडेशन च्या आज पर्यंतच्या वाटचालीबाबत आपण समाधानी आहात का ?

समाधानी आहे असे म्हटले तर चळवळ संपून जाईल .परंतु योग्यरीतीने वाटचाल सुरू आहे. एवढेच मी सांगू शकतो. मी तर म्हणेल फक्त ही एक सुरुवात आहे. पाणी फाउंडेशन सारख्या अनेक उपक्रमाची महाराष्ट्राला गरज आहे. स्वप्नातला गाव निर्माण व्हावीत, जगातून लोक ती पहायला यावे एवढा  बदल घडवण्याची कुवत गावातील लोकात आहे हे निश्चित.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा