शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

...तर विदर्भ राज्य करण्याशिवाय पर्याय नाही - श्रीहरी अणे

By admin | Updated: April 17, 2017 00:43 IST

शेगाव- महाराष्ट्राला जगायचे असेल, तर विदर्भ राज्य करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विदर्भवादी नेते तथा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी केले.

शेगाव : मोठ्या राज्यात आर्थिक भेदभाव वाढीस लागते. विकासात असमतोल निर्माण होतो. प्रशासन नीट काम करू शकत नाही आणि सरकार राज्य कारभार करण्यात अपयशी ठरते. यातून पुढे प्रादेशिक असंतुलन होत असल्याचे स्पष्ट करून महाराष्ट्राला जगायचे असेल, तर विदर्भ राज्य करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विदर्भवादी नेते तथा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी केले.येथे आयोजित एक दिवसीय विदर्भ जागृती अभ्यास शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या कुटुंबाला चालवण्यासाठी लागणारा खर्च आणि संपूर्ण मोहल्ल्याचे भरणपोषण करण्यासाठी लागणारा खर्च जसा एक समान होऊ शकत नाही. त्याप्रमाणे आकाराने आणि लोकसंख्येने मोठे असलेल्या राज्यांना सांभाळणे कोणत्याच पातळीवर शक्य होत नाही. त्यामुळे प्रादेशिक असंतुलन निर्माण होते. जगणे कठीण होऊन बसते. महाराष्ट्रात अशीच स्थिती निर्माण झाली असल्याचा दावा त्यांनी केला. विदर्भ राज्याच्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यतेबद्दल ते म्हणाले, व्हायबिलिटी म्हणजे खिशात पैसा खुळखुळणे नव्हे, तर लोक आर्थिकदृष्ट्या तग धरू शकतील काय, असा त्याचा अर्थ आहे. इतर राज्यातील जिल्ह्यांची शहरे आणि विदर्भातील जिल्ह्याचे शहर याची तुलना केल्यास आपल्याला भकासपणा जाणवेल. कर्जमा फीबाबत बोलताना ते म्हणाले, की शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना ते पुढे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी त्यांच्या शेतमालास योग्यभाव आणि ठिकठिकाणी अनुदान शासनाने द्यायला हवे तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो.या पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आघाडीचे मुख्य संघटक श्रीकांत तराळ, बुलढाणा जिल्हा संघटक मनीष किरडे, अकोल्याचे संघटक चंद्रकांत बोदडे, अमोल कठाने, अजय गवई, प्रशांत वाघमारे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रदिनी विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात फडकणार काळे झेंडे! ाहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवादी संघटनांनी वेगळ्या विदर्भाचा पुन्हा एकदा संकल्प सोडला. या निमित्त विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने विदर्भाच्या सर्व अकराही जिल्ह्यात विदर्भाचे झेंडे फडकवण्यात येतील, अशी घोषणा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केली असून, सर्व कार्यकर्त्यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती अणे यांनी दिली. विदर्भ वेगळा व्हावा, यासाठी घेतलेल्या जनमत चाचणीत संपूर्ण या मागणीच्या बाजूने भरभरून मते पडली. तरीही राज्यकर्ते येथील जनतेवर अन्यायच करीत आहेत. म्हणूनच "महाराष्ट्र दिन" काळा दिवस पाळून आम्ही शासनाचा निषेध करीत आहोत, असे अणे यांनी सांगितले. विदर्भापेक्षा मराठवाड्याची स्थिती अत्यंत खराब कारण विदर्भापेक्षाही मराठवाड्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. विदर्भाला माझ्यासारखे बोलणारे पाच लोक तरी आहेत, पण मराठवाड्याच्या बाजूने बोलणारे कोणीच नाही. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव यांच्या नंतर मराठवाडा हा नेतृत्वहीन झालेला आहे. त्याचा प्रत्यय येत्या उन्हाळ्यात पाण्याने भरलेल्या ट्रेन्स आल्यानंतर सर्वांनाच दिसणार आहे. त्यामुळे मराठवाडाही स्वतंत्र होणे तेथील नागरिकांसाठी अत्यंत जरुरीचे आहे, असे अ‍ॅड. श्रीहरी अणे म्हणाले.