शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

विवेकानंद जन्मोत्सवातून समाजाची वैचारिक जडणघडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

हिवरा आश्रम : विवेकानंद जयंती महोत्सव हा समाजाची वैचारिक व आध्यात्मिक भूक लक्षात घेऊन सुरू केलेला प्रबोधनाचा जागर आहे. ...

हिवरा आश्रम : विवेकानंद जयंती महोत्सव हा समाजाची वैचारिक व आध्यात्मिक भूक लक्षात घेऊन सुरू केलेला प्रबोधनाचा जागर आहे. विवेकानंद आश्रमात तीन दिवस लावणाऱ्या या उत्सवातून महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यानकार, कीर्तनकर, प्रबोधनकार यांचे वैचारिक मार्गदर्शन समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे. विवेकानंद जन्मोत्सवातून समाजाची वैचारिक जडणघडण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत उत्तम कांबळे यांनी केले. विवेकानंद आश्रमात सुरू असलेल्या जयंती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या व्यासपीठावरील ज्ञानयज्ञात आपल्या व्याख्यानातून ते श्रोत्यांसमोर बुधवारी ते बोलत होते.

पुढे बोलताना साहित्यिक कांबळे म्हणाले की, आई हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा, वात्सल्याचा व ममतेचा विषय असतो. आईचा महिमा अगाध, अवर्णनीय, अलौकिक व शब्दातीत आहे. जगात प्रत्येक व्यक्तीला आपली आई प्रिय असते. जगात आईची उदंड रूपे दिसून येतात. व्यवस्था कधी शस्त्राला घाबरत नाही. व्यवस्था शब्दांना घाबरत असते. शब्दांना बळ देण्याची ताकद आईच्या मायेत असते. संकटात, कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची शक्ती म्हणजे आई असते. आपण साने गुरुजी यांची आई वाचा. साने गुरुजींच्या आईने महाराष्ट्रातील चार पिढ्या घडविल्या. यावरून आई व आई शब्दात किती ताकद आहे याची तुम्हाला कल्पना येईल. शाळेत पहिला निबंध कोणता लिहिला असेल असेल तर तो आई आहे. आईवर लिहिणे खूप सोपे. आईवर लिहिणे खूप आनंददायी. उत्तम कांबळे यांनी आई समजून घेताना या व्याख्यानातून आई व आईच्या संघर्षाला शब्दाव्दारे प्रगट केले.