शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

Buldhana: बुलढाण्यात शेकडो वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू, नमुने तपासणीसाठी पाठविले

By निलेश जोशी | Updated: August 26, 2023 19:13 IST

Buldhana: शहर परिसरासह लगतच्या ग्रामीण भागात वराहांचा अज्ञात आजाराने मृत्यू होत असून जवळपास दोन महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या आठ दिवसापासून त्याचे प्रमाण वाढले आहे.

- नीलेश जोशी बुलढाणा - शहर परिसरासह लगतच्या ग्रामीण भागात वराहांचा अज्ञात आजाराने मृत्यू होत असून जवळपास दोन महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या आठ दिवसापासून त्याचे प्रमाण वाढले आहे. २६ ऑगस्ट रोजी एका मृत वराहाचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने अैांध (पुणे) येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठविले आहे. परंतू वराहांच्या मृत्यूमुळे मात्र जनमानसात घबराट आहे.

वराहांच्या मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. त्यातच वेळेत मृत वराह उचलण्यात येत नसल्याने त्याच्या दुर्गंधीचीही समस्या नागरिकांना जाणवत आहे. बुलढाणा शहर परिसरासह, सागवन, सुंदरखेड सह लगतच्या ग्रामीण भागात वराहांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचाही फोन रोज खणखणत असून पालिका कर्मचारीही या वराहांची विल्हेवाट लावण्यात व्यस्त झाले आहे. दरम्यान नेमक्या कोणत्या आजारामुळे या वराहांचा मृत्यू होतोय ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. वर्तमान स्थितीत दररोज १५ ते २० वराहांचा मृत्यू होत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी सुनील बेंडवाल यांनी सांगितले.

दोन महिन्यापासून सुरू असलेला हा प्रकार गेल्या आठ दिवसात वराहांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने समोर आला. विशेष म्हणजे वराहांची शिकार करण्यात एक्सपर्ट झालेले बुलढाण्यातील मोकाट कुत्रेही वराहाच्या मृत्यूनंतर त्याला तोंड लावत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमका आजार काय? याचेही निदान होण्याची गरज आहे.

पशुसंवर्धन विभागाने घेतले नमुनेयासंदर्भात पालिकेकडे नागरिकांनी विचारणा केल्यानंतर पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने २६ ऑगस्ट रोजी एका मृत वराहाचे शवविच्छेदन करून नमुने घेतले आहेत. आता हे नमुने अैांध येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यासोबतच अकोला येथील प्रादेशिक रोग अन्वेषण विभागालाही यासंदर्भात माहिती देण्यात आली असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

८ ते १५ दिवसाय येईल अहवालवहारांच्या मृत्य संदर्भाने एका वराहाचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने अैांध येथील रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आले असून आगामी आठ ते दहा दिवसात त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. एकाद्या संसर्गजन्य रोगामुळे या वरहांचा मृत्यू होत असावा अशी शक्यता पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पाचरणे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा