शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मानवता ही जात आणि धर्माच्या पलिकडे - प्रा. शमसुद्दीन तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:22 IST

संविधान हा धर्म ग्रंथ म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नसावी, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

खामगाव : शांतता, अंहिसा आणि मानवता ही त्रिसुत्रीच प्रत्येक धमार्ची शिकवण आहे. मात्र, दोन्ही कडील काही आडमुठ्या तत्वांमुळेच समाजातील शांतता भंग पावत आहे. मानवता ही जात आणि धर्माच्या पलिकडे असून, संविधान हा धर्म ग्रंथ म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नसावी, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्याशी साधलेला संवाद...

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या प्रमुख उद्देशाबाबत काय सांगाल? भारतीय संविधान आणि संविधानातील सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वता या मानवी मुल्याची जपणूक करणे हाच मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम महिला आणि युवकांना संविधानात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी या मंडळाचे प्रामाणिक प्रयत्न आहेत.

बकरी ईद निमित्त  रक्तदान शिबिरा मागील संकल्पना काय?  - कुर्बानीचा अर्थ अधिक समाजाभिमुख व्हावा, त्याग करण्याची मानसिकता वाढावी व सामाजिक सद्भाव वाढावा म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्यावतीने  रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. 

कधीपासून हे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते?- गत दहा वर्षापासून बकरी ईद निमित्त   १२ ते १९ आॅगस्टच्या दरम्यान  रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. पूर्वी बकरी ईदच्या दिवशी हे रक्तदान शिबिर आयोजित केले जायचे. मात्र, राज्यभरातून मिळणाºया उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता या उपक्रमाला सप्ताहाचे स्वरूप प्राप्त होत आहे. पुणे, औरंगाबाद, सांगली, सातारा आणि नागपूर येथील मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून हा उप्रकम आयोजित केला जातो.  यावर्षी मंडळाने ५१ हजार रूपयांचा निधी नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून दिला. बकरी ईदची कुर्बानी टाळून मंडळाने घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. प्रत्येक धर्म शांतता, अंहिसा आणि मानवतावादी आहे. परंतु असे असतानाही हिंसा, अत्याचार आणि शांतता भंगाचे प्रकार वाढीस लागले आहे. या प्रकाराच्या समूळ उच्चाटनासाठी सैध्दांतिक आणि व्यवहारातील धर्मामध्ये ‘समन्वय’ गरजेचा आहे. संविधानाला अभिप्रेत  असणाºया समाज निर्मितीसाठी मुस्लिम  मंडळाचा लढा आहे.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कधी झाली?माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी कुठलाही धर्म-रूढी-परंपरा अडसर ठरता कामा नये. देश धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र व्हावे या उद्दात्त हेतूने थोर विचारवंत हमीद दलवाई यांनी २२ मार्च १९७० रोजी ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना केली. तत्पूर्वी ‘समान नागरी कायद्यासाठी’ हमीद दलवाई यांनी १९६६ मध्ये विधासभेवर तलका पीडित महिलांचा मोर्चा काढला होता. गत चार दशकात मंडळाने विविध समाजपयोगी उपक्रम राबविले असून आता या मंडळाची सुवर्ण महोत्सवी वर्षांकडे वाटचाल सुरू आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत