शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

तांदळाशिवाय खिचडी कशी शिजवशील रे भावा...!; साडे ८ हजार विद्यार्थी उपाशी

By अनिल गवई | Updated: April 5, 2023 17:25 IST

शहरी भागातील साडे आठ हजार विद्यार्थी उपाशी

खामगाव - प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजनेतंर्गत खामगाव शहरातील नगर पालिका आणि अनुदानित खासगी शाळांमध्ये गत पाच दिवसांपासून तांदळाचा पुरवठाच नाही. तांदूळ उपलब्ध नसल्याने नगर पालिकेतील ३२५० आणि खासगी शाळेतील ५२०० विद्यार्थ्यांना खिचडीविणाच रहावे लागत असल्याचे चित्र आहे.

शालेय पोषण आहार मधान्य भोजन योजनेतंर्गत (प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजनेतंर्गत) इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मधान्य भोजनात खिचडीचे वितरण करण्यात येते. खामगाव येथील नगर पालिकेच्या १४ शाळेतील ३२५० तर खासगी अनुदानीत १४ शाळांमधील ५२०० आणि जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमधील विद्यार्थी या योजनेतंर्गत पात्र आहेत. दरम्यान, गत पाच दिवसांपासून या विद्यार्थ्यांसाठी तांदूळच उपलब्ध नाही. त्यामुळे शहरी भागातील तब्बल ३० शाळांमध्ये खिचडीच शिजली नाही. तांदळाचा साठा संपल्याने तांदळाशिवाय खिचडी कशी शिजवायची रे भावा?, असा प्रश्न संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना पडला आहे.

किराणा मालाचे वाटपपुरवठादारामार्पत गत पाच दिवसांपासून तांदूळ अप्राप्त आहेत. मात्र, त्याचवेळी इतर धान्यादि तसेच किराणा मालाचा पुरवठा बुधवारपासून सुरू करण्यात आला आहे. इतर साहित्य असलेतरी खिचडीतील मुख्य घटक तांदूळच नसल्याने शहरी भागातील साडेआठ हजार विद्यार्थी खिचडीविना असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात हीच परिस्थिती कायम

शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही हीच परिस्थिती कायम असल्याचे समजते. त्यामुळे गत आठवड्यापासून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खिचडी उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

खिचडी शिजविण्यासाठी तांदळाचा साठा पाच दिवसांपूर्वीच संपला आहे. मागणीकरून ही पुरवठादाराकडून तांदूळ उपलब्ध केले गेले नाहीत. इतर धान्यादी माल म्हणजेच किराणा मालाचा बुधवारपासून पुरवठा करण्यात येत आहे. तांदूळ प्राप्त होताच खिचडी शिजविणे पूर्ववत केले जाईल - आनंद देवकते, प्रशासन अधिकारी, (शिक्षण)नगर परिषद खामगाव